अ‍ॅपशहर

विहिरींमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

विक्रमगड तालुक्यात राज्य शासनाच्या रोजगार हमी सिंचन योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या विह‌रिींमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत तातडीने चौकशी करून कारवाई करा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

Maharashtra Times 28 Feb 2017, 4:00 am
उपोषण करण्याचा मनसेचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम well worth millions corruption
विहिरींमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

नरेंद्र पाटील, पालघर
विक्रमगड तालुक्यात राज्य शासनाच्या रोजगार हमी सिंचन योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या विह‌रिींमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत तातडीने चौकशी करून कारवाई करा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत २०११-१२मध्ये ६०७ विहिरी मंजूर झाल्या आहेत. मात्र या विह‌रिींची कामे पूर्ण न करताच कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखविले असून एका विह‌रिीचा खर्च एक लाख ९० हजार रुपये प्रमाणे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे परेश रोडगे यांनी पाहणीअंती केला आहे. त्यामुळे येत्या ३ मार्च रोजी न्यायासाठी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी निवदेनाद्वारे दिला आहे. तालुक्यात २-११-१२मध्ये ६०७ सिंचन विह‌रिींची कामे हाती घेण्यात आली होती. त्याअनुशांगने ऑनलाइन रेकॉर्डवर ४३६ विहिरी पूर्ण कामे झाल्याचे दाखविले आहे. तर ५७ विह‌रिींची कामे अपूर्ण आहेत. तर आठ विहीरींची कामे सुरूच झासेसी नाहीत. तर १-८ विह‌रिी रदद केल्याचे दाखविले आहे. यासाठी सहा कोटी ५० लाख रुपये खर्च झाल्याचेही दाखविले आहे. मात्र ही रक्कम लाभार्थ्याना मिळालेली नाही. मनसेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार फक्त १४५ विहीरींची कामे झाली असून बाकी सर्व विह‌रिी अपूर्णच आहेत. त्यावरील सुमारे १२ कोटी ५० लाखांची रक्कम बँक खात्यातून काढून वापरण्यात आली आहे. याबाबतचे निवेदनही गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

तालुक्यातील ६०७ विह‌रिींपैकी सर्वच विह‌रिींची कामे अपूर्ण आहेत. एका विह‌रिीला एक कोटी ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत. पण ही कामे न करताच निधी लाटलेला दिसत आहे. या संपूर्ण योजनेमध्ये सुमारे १२ कोटी ५० लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
- परेश रोडगे
मनसे तालुका विक्रमगड

हा प्रकार २०११-१२ मधील असून मी आताच नव्याने प्रभारी चार्ज घेतलेला आहे. तसेच याबाबत त्यावेळेस तपासण्या झालेल्या असून त्यांचा अहवाल सादर केलेला नाही, तर यामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांकडेही तीन-तीन तालुक्यांचा भार असून ते देखील प्रभारीच आहेत. तसेच या विभागातील सर्वच पदे रिक्त असल्याने याबाबतचे काम थोडे हळू सुरू आहे. मात्र यासंदर्भात सखोल चौकशी होईल.
- -प्रदीप डोल्हारे
प्र.गटविकास अधिकारी प. स. विक्रमगड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज