ठाणे: 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. पवार यांच्या या वक्तव्यामुळं खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आलं आहे.
वाचा: भाजपचे १२५ उमेदवार जाहीर; तावडे, खडसेंना डावलले!
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवार याद्यांमध्ये खडसे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळं ते नाराज असून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्यावर मोठा दबाव येत आहे. नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी जळगावला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. हे सगळं सुरू असतानाच शरद पवार यांनी आज खडसे संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं.
वाचा: इच्छुकांनी परजल्या बंडाच्या तलवारी
ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पवार स्वत: उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. 'सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला योग्य संधी मिळाली नाही की तो पर्यायाच्या शोधात असतो. खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत,' असं ते म्हणाले. तसंच, विजय नाहटा यांचा जन्मच बारामतीमध्ये झाला होता, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पवारांना अजिबात भेटलेलो नाही: खडसे
शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा खडसे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. 'तीन महिन्यांत काय, तीन वर्षांत कोणत्याही पवारांशी माझी भेट झालेली नाही. भाजप सोडण्याचा असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही,' असं खडसे यांनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी
वाचा: भाजपचे १२५ उमेदवार जाहीर; तावडे, खडसेंना डावलले!
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवार याद्यांमध्ये खडसे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळं ते नाराज असून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्यावर मोठा दबाव येत आहे. नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी जळगावला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. हे सगळं सुरू असतानाच शरद पवार यांनी आज खडसे संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं.
वाचा: इच्छुकांनी परजल्या बंडाच्या तलवारी
ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पवार स्वत: उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. 'सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला योग्य संधी मिळाली नाही की तो पर्यायाच्या शोधात असतो. खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत,' असं ते म्हणाले. तसंच, विजय नाहटा यांचा जन्मच बारामतीमध्ये झाला होता, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पवारांना अजिबात भेटलेलो नाही: खडसे
शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा खडसे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. 'तीन महिन्यांत काय, तीन वर्षांत कोणत्याही पवारांशी माझी भेट झालेली नाही. भाजप सोडण्याचा असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही,' असं खडसे यांनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी