म. टा. वृत्तसेवा, कल्याण
येत्या तीन वर्षांत एक कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार असल्याची घोषणा उपराकार लक्ष्मण माने यांनी केली. ते कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी येथे आयोजित दोनदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलनात बोलत होते. कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक माने बोलत होते.
या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल शिंदे हे आहेत. तर, स्वागताध्यक्ष नाना बागुल आहेत. या कार्यक्रमाला भन्ते गौतमरत्न थेरो, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दयानंद कितरकर, दलित मित्र अण्णा रोकडे आदी प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते बौद्धभूमी फाउंडेशन वालधुनी येथपर्यंत ग्रंथफेरी काढून करण्यात आली. ‘धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे महत्त्वाचे असताना दलित चळवळीतील लोक रस्त्यावर उतरून धर्मप्रसार करण्यापेक्षा डिग्री मिळविण्यात मश्गुल आहेत. त्यांचे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित झाले आहे. मात्र सरकारच्या धोरणामुळे आपण बुडण्याची वेळ आली असून पुढील तीन वर्षांत आपण तब्बल एक कोटी लोकांना धर्माची दीक्षा देणार आहोत’, अशी घोषणा त्यांनी केली. या साहित्य संमेलनात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी यासाठी उपस्थित राहणार आहेत.
येत्या तीन वर्षांत एक कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार असल्याची घोषणा उपराकार लक्ष्मण माने यांनी केली. ते कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी येथे आयोजित दोनदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलनात बोलत होते. कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक माने बोलत होते.
या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल शिंदे हे आहेत. तर, स्वागताध्यक्ष नाना बागुल आहेत. या कार्यक्रमाला भन्ते गौतमरत्न थेरो, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दयानंद कितरकर, दलित मित्र अण्णा रोकडे आदी प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते बौद्धभूमी फाउंडेशन वालधुनी येथपर्यंत ग्रंथफेरी काढून करण्यात आली. ‘धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे महत्त्वाचे असताना दलित चळवळीतील लोक रस्त्यावर उतरून धर्मप्रसार करण्यापेक्षा डिग्री मिळविण्यात मश्गुल आहेत. त्यांचे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित झाले आहे. मात्र सरकारच्या धोरणामुळे आपण बुडण्याची वेळ आली असून पुढील तीन वर्षांत आपण तब्बल एक कोटी लोकांना धर्माची दीक्षा देणार आहोत’, अशी घोषणा त्यांनी केली. या साहित्य संमेलनात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी यासाठी उपस्थित राहणार आहेत.