म. टा. वृत्तसेवा, कल्याण :
गणेशोत्सव कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण. वर्षभरात कधीही गावी न जाणारा प्रत्येकजण गणपतीला मात्र हमखास कोकणात पोहोचतो. यंदा मात्र करोनामुळे अनेकांना गावी जाण्याचा बेत रद्द करावा लागणार असल्यामुळे गणेशोत्सव इथेच साजरा करण्यावर नागरिकांचा भर असण्याची शक्यता आहे. यामुळे साहजिकच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत घरगुती गणपतीची संख्या वाढण्याचा अंदाज डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी व्यक्त करत त्यादृष्टीने तयारी करावी लागणार असल्याचे मत मांडले.
काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी महापालिका क्षेत्रातील पोलिस अधिकारी, महापालिका अधिकारी, तहसीलदार यांच्या बरोबर ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी यंदा शासनाने गणेशोत्सवासाठी आखून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गणेश मंडळाबरोबर बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गणेश विसर्जन तलावावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 'विसर्जन आपल्या दारी' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रशासनाकडून ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विसर्जनस्थळे तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे मंडपांची उभारणी व तद्अनुषंगीक बाबींबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोकणात जाता येणार नसल्यामुळे ते हा उत्सव आपल्या घरातच राहून साजरा करण्याची शक्यता असल्याने घरगुती गणपतींची संख्या वाढणार असल्याचे गृहीत धरून त्यासाठी तयारी करावी लागणार असल्याचे मत मोरे यांनी मांडले. तसेच सार्वजनिक गणपती मंडळांच्या विसर्जनासाठी विसर्जन स्थळी सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी लागेल. त्याचप्रमाणे स्वयंसेवकही तयार ठेवावे लागतील, त्यासाठी पूर्वतयारी करणेबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. गणेशमंडळांना लागणाऱ्या परवानग्या यंदाही एक खिडकी योजनेद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार असून या याची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन मिटिंगचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून यात मंडप शुल्क आकारणीच्या दरनिश्चिती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण. वर्षभरात कधीही गावी न जाणारा प्रत्येकजण गणपतीला मात्र हमखास कोकणात पोहोचतो. यंदा मात्र करोनामुळे अनेकांना गावी जाण्याचा बेत रद्द करावा लागणार असल्यामुळे गणेशोत्सव इथेच साजरा करण्यावर नागरिकांचा भर असण्याची शक्यता आहे. यामुळे साहजिकच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत घरगुती गणपतीची संख्या वाढण्याचा अंदाज डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी व्यक्त करत त्यादृष्टीने तयारी करावी लागणार असल्याचे मत मांडले.
काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी महापालिका क्षेत्रातील पोलिस अधिकारी, महापालिका अधिकारी, तहसीलदार यांच्या बरोबर ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी यंदा शासनाने गणेशोत्सवासाठी आखून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गणेश मंडळाबरोबर बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गणेश विसर्जन तलावावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 'विसर्जन आपल्या दारी' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रशासनाकडून ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विसर्जनस्थळे तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे मंडपांची उभारणी व तद्अनुषंगीक बाबींबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोकणात जाता येणार नसल्यामुळे ते हा उत्सव आपल्या घरातच राहून साजरा करण्याची शक्यता असल्याने घरगुती गणपतींची संख्या वाढणार असल्याचे गृहीत धरून त्यासाठी तयारी करावी लागणार असल्याचे मत मोरे यांनी मांडले. तसेच सार्वजनिक गणपती मंडळांच्या विसर्जनासाठी विसर्जन स्थळी सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी लागेल. त्याचप्रमाणे स्वयंसेवकही तयार ठेवावे लागतील, त्यासाठी पूर्वतयारी करणेबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. गणेशमंडळांना लागणाऱ्या परवानग्या यंदाही एक खिडकी योजनेद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार असून या याची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन मिटिंगचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून यात मंडप शुल्क आकारणीच्या दरनिश्चिती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.