अ‍ॅपशहर

सँडलला लागलेला चिखल साफ करण्यासाठी गेली अन् भातसा नदीत पडली; जीवरक्षक टीमचं होतंय कौतुक

Maharashtra News : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने नद्यांना पूर आला आहे. नद्यांची पातळी वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात धबधब्यांसह नदीकाठच्या पर्यटनाच्या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही कल्याणजवळ एक मोठी घटना घडली. या घटनेत महिला नदी पडल्याने ती वाहून जावू लागली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2022, 3:18 pm
टिटवाळा, कल्याण : जीवरक्षक टीमच्या ५ सदस्यांनी ५०० मीटरहून अधिक अंतर पोहत जात एका महिलेचा जीव वाचवला आहे. त्यामुळे या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman rescued from drowning in bhatsa river
सँडलला लागलेला चिखल साफ करण्यासाठी गेली अन् भातसा नदीत पडली; जीवरक्षक टीमचं होतंय कौतुक


सँडलला लागलेला चिखल साफ करण्यासाठी भातसा नदी पात्राच्या काठावर महिला गेली. यावेळी अचानक तोल जाऊन नदीच्या पात्रात ही महिला पडली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होती. हे लक्षात येताच गरसे गावातील जीवरक्षक पथकाने स्वत:च्या जीवाची बाजी लावत त्या महीलेचे प्राण वाचवले आहेत. रेश्मा जाधव (३९) असे महिलेचे नाव असून ती टिटवाळ्यात राहते.

शहापूर तालुक्यातील एका गावात रेश्मा ह्या कुटुंबासह गेल्या होत्या. पाहुणचार घेतल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पुन्हा टिटवाळा येथे घरी येण्यासाठी कारने निघाल्या. दरम्यान, गरसे गावनजीक पुलावर निर्सगाचा आनंद घेण्यासाठी भातसा नदीच्या काठावर थोडा वेळ थांबण्याचा विचार त्यांनी केला आणि त्या थांबल्या. त्यावेळी त्यांच्या सँडलला चिखल लागल्याने त्या साफ करण्यासाठी नदीच्या काठावर पाण्याजवळ गेल्या. यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या.

डोंबिवली हादरली! पूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलिंडरचा स्फोट, एक गंभीर जखमी

पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे नदीच्या वेगवान प्रवाहात त्या वाहू जाऊन लागल्या. त्यांच्यासोबत असलेल्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. यावेळी गरसे गावाचे पोलिस पाटील शशिकांत दिवाने यांनी जीवरक्षक टिमचे प्रदिप गायकर यांना तातडीने कॉल करून एक महीला भातसा नदी पात्रात वाहून जात असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच गायकर हे कोणताही विलंब न करता भातसा नदी पात्रात जवळ १० मिनिटांत घटनास्थळी बचाव उपकरणे, दोरी, जॅकेट घेऊन पोहचले.

मुख्यमंत्री साहेब बघा खड्ड्याने घेतला बळी, काटई-बदलापूर रस्त्यावर तरुणाचा मृत्यू

सुदैवाने नदीच्या पात्रातील एका खडकाचा आधार घेत महीला नदीच्या मध्यभागी प्रवाहात आडकली होती. यावेळी आपल्या जीवाची बाजी लावत जीवरक्षक टिमच्या ५ सदस्यांनी ५०० मीटरहून अधिक अंतर पोहत जात आणि जोरदार वाहत्या पाण्यातून महिलेला बुडण्यापासून वाचवले. या टीमच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज