तेजस्विनी महिला संघटनेच्या माध्यमातून महिलांचा प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मध्य रेल्वेच्या मार्गावरील महिला प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक असली, तरी या महिलांसाठी रेल्वेडब्यांची आणि विशेष गाड्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करण्यासोबत जनरल डब्यांमधून प्रवास करण्याची नामुष्की महिलांवर येत आहे. हा अनुभव अत्यंत विदारक असतो. यामुळे महिला विशेष गाड्यांची आणि महिलांसाठीच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी डोंबिवलीतील तेजस्विनी महिला संघटनेच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच वेळा महिलांसाठी विशेष फेऱ्या असतात, तर केवळ १५ डब्यांच्या काही गाड्यांमध्येच ठराविक डबे महिलांसाठी आरक्षित ठेवतात. परंतु मध्य रेल्वेच्या सगळ्याच गाड्या १५ डब्यांच्या करून या गाड्यांना पहिले तीन डब्बे महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची गरज संघटनेच्या वतीने व्यक्त होत आहे. यासाठी संघटनेच्या लता आरगडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकूण प्रवाशांच्या ४० टक्के महिलांचे प्रमाण वाढले आहे. अनेक महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला, उद्योग करणाऱ्या महिला आणि व्यावसायिक महिला मोठ्या संख्येने रेल्वेचा प्रवास करतात. मुंबईचा रेल्वेप्रवास सुरक्षित असल्यामुळे महिला प्रवासांची गर्दी अधिक वाढत असते. परंतु या महिलांना सामवून घेण्याइतके डब्बे अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही. महिला विशेष गाड्यांची संख्याही सकाळी आणि संध्याकाळी एकच्या पलीकडे गेलेली नाही. त्यामुळे या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी तेजस्विनी महिला संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या संघटनेच्या लता आरगडे यांनी महिला प्रवाशांच्या वतीने रेल्वेमंत्र्यांपासून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे. मध्य रेल्वेच्या सगळ्या गाड्या १५ डब्यांच्या करून त्यातील किमान ४० टक्के भाग महिलांसाठी दिल्यास जनरल डब्यातील महिलांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे आरगडे सांगतात. एक जलदगाडीही महिलांसाठी उपलब्ध झाल्यास लांबचा प्रवास अधिक वेगात आणि आपल्या हक्काच्या गाडीतून होऊ शकेल, असे त्यांना वाटते. यासाठी पुढील पाठपुरावा कायम राहणार आहे. रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मध्य रेल्वेच्या मार्गावरील महिला प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक असली, तरी या महिलांसाठी रेल्वेडब्यांची आणि विशेष गाड्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करण्यासोबत जनरल डब्यांमधून प्रवास करण्याची नामुष्की महिलांवर येत आहे. हा अनुभव अत्यंत विदारक असतो. यामुळे महिला विशेष गाड्यांची आणि महिलांसाठीच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी डोंबिवलीतील तेजस्विनी महिला संघटनेच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच वेळा महिलांसाठी विशेष फेऱ्या असतात, तर केवळ १५ डब्यांच्या काही गाड्यांमध्येच ठराविक डबे महिलांसाठी आरक्षित ठेवतात. परंतु मध्य रेल्वेच्या सगळ्याच गाड्या १५ डब्यांच्या करून या गाड्यांना पहिले तीन डब्बे महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची गरज संघटनेच्या वतीने व्यक्त होत आहे. यासाठी संघटनेच्या लता आरगडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकूण प्रवाशांच्या ४० टक्के महिलांचे प्रमाण वाढले आहे. अनेक महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला, उद्योग करणाऱ्या महिला आणि व्यावसायिक महिला मोठ्या संख्येने रेल्वेचा प्रवास करतात. मुंबईचा रेल्वेप्रवास सुरक्षित असल्यामुळे महिला प्रवासांची गर्दी अधिक वाढत असते. परंतु या महिलांना सामवून घेण्याइतके डब्बे अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही. महिला विशेष गाड्यांची संख्याही सकाळी आणि संध्याकाळी एकच्या पलीकडे गेलेली नाही. त्यामुळे या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी तेजस्विनी महिला संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या संघटनेच्या लता आरगडे यांनी महिला प्रवाशांच्या वतीने रेल्वेमंत्र्यांपासून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे. मध्य रेल्वेच्या सगळ्या गाड्या १५ डब्यांच्या करून त्यातील किमान ४० टक्के भाग महिलांसाठी दिल्यास जनरल डब्यातील महिलांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे आरगडे सांगतात. एक जलदगाडीही महिलांसाठी उपलब्ध झाल्यास लांबचा प्रवास अधिक वेगात आणि आपल्या हक्काच्या गाडीतून होऊ शकेल, असे त्यांना वाटते. यासाठी पुढील पाठपुरावा कायम राहणार आहे. रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.