उल्हासनगर : गणपतीच्या काळात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. शहरातील कॅम्प नं. ४ येथील आशेळेपाडा परिसरातील गणराज कॉलेनी येथे पंडित बिजबिरे (२०) हा तरुण राहतो. तो सायंकाळी कॅम्प नं. ४ येथील पेन्सील फॅक्टरीजवळील चायनीज गाडीवर भेळ खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी सागर हा दोन मित्रांसह त्याठिकाणी आला. त्याने पंडितला शिवीगाळी करत पंडितवर वार केले. जबर जखमी पंडितला कळवा येथील शिवाजी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात सागर व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तरुणावर केला प्राणघातक हल्ला
गणपतीच्या काळात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Maharashtra Times 1 Oct 2017, 4:00 am