अ‍ॅपशहर

जिप शिक्षिकांना दुर्गमभागांत नियुक्ती नाही

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षिकांना दुर्गम व अतिदुर्गम भागात यापुढे नियुक्त करण्यात येणार नाही. सध्या अशा शाळेत कार्यरत असणाऱ्यांनी बदली प्रक्रियेत अर्ज केल्यास त्यांना बदलीचा अधिकार प्राप्त होईल, असे शासन निर्णयात म्हटल्याने शिक्षिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Maharashtra Times 27 Feb 2018, 8:11 am

म. टा. वृत्तसेवा, पालघर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम zip teachers are not appointed in the rugged areas
जिप शिक्षिकांना दुर्गमभागांत नियुक्ती नाही


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षिकांना दुर्गम व अतिदुर्गम भागात यापुढे नियुक्त करण्यात येणार नाही. सध्या अशा शाळेत कार्यरत असणाऱ्यांनी बदली प्रक्रियेत अर्ज केल्यास त्यांना बदलीचा अधिकार प्राप्त होईल, असे शासन निर्णयात म्हटल्याने शिक्षिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेच्या दुर्गम-अतिदुर्गम शाळांमध्ये नियुक्तीपासून शिक्षिकांना दिलासा मिळाला असून, शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे शिक्षका व त्यांच्या कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले आहे.

दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन अध्यापन करणे जिकरीची बाब आहे. पालघर जिल्ह्याच्या बहुतेक सर्वच तालुक्यातील काही भागांत जाऊन काम करणे विशेषत: शिक्षिकांसाठी खूपच अवघड असून, केवळ नोकरी सांभाळण्यासाठी काहीजणी मानसिक दडपणात हे दिव्य पार पाडत आहेत.

प्रतिकूल परिस्थिती असलेल्या शाळांच्या ठिकाणी प्रवास करणे असह्य असल्याने शिक्षिकांसाठी नियुकी न देण्याची बाब विचाराधीन होती. १५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयाद्वारे जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या तसेच अवघड क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या ज्या शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत.

तेथे स्थानिक परिस्थितीमुळे शिक्षिकांना काम करण्यास प्रतिकूल म्हणून घोषित करण्याची कार्यवाही जि. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करण्याचे म्हटले आहे. शिवाय अशा ठिकाणी प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्तीने त्यांना पदस्थापना न देण्याचे नमूद केले आहे. सध्या अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षिकांनी मे २०१८ च्या बदली प्रक्रियेत अर्ज करावेत, त्यांना बदलीचा अधिकार प्राप्त होईल असे म्हटले आहे.

दरम्यान जिलहा परिषदेचया शिक्षिका रूपाली खैरनार यांनी व महिला शिक्षिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. "शासनाचा हा निर्णय खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्याचे स्वागत होत असून त्यामुळे आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा चांगला परिणाम अध्यापनावरही दिसून येईल अशी भावना व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज