वर्धा : पॅरासिटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोज घेतल्याने २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. या युवकावर तब्बल ४० दिवस उपचार करण्यात आले. मात्र त्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. प्रकरणी वर्धा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रजत मेंढे (वय २७, रा. शिवाजी चौक वर्धा) असं मृताचं नाव आहे. वर्ध्याच्या एका खासगी फायनान्समध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रजत मेंढे हा कार्यरत होता. २९ जानेवारी रोजी रात्री रजत मेंढे हा कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. ३० जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. वडिलांनी वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे उत्तर दिले.
सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण, ९ मार्च रोजी रजतचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. प्रकरण आज वर्धा पोलिसांकडे आज वर्ग करण्यात आलेय.
अनेकदा छोट्या मोठ्या आजारासाठी नागरिक डॉक्टरांच्या सल्या विना औषधोपचार घेत असतात. अनेकांना याचा लाभ होतो मात्र काहींच्या शरीरावर औषधांचे दुष्परिणाम सुद्धा होतात. यामुळे डॉक्टरांच्या सल्याविना औषधी घेणे नागरिकांनी टाळावे.
रजत मेंढे (वय २७, रा. शिवाजी चौक वर्धा) असं मृताचं नाव आहे. वर्ध्याच्या एका खासगी फायनान्समध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रजत मेंढे हा कार्यरत होता. २९ जानेवारी रोजी रात्री रजत मेंढे हा कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. ३० जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. वडिलांनी वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे उत्तर दिले.
सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण, ९ मार्च रोजी रजतचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. प्रकरण आज वर्धा पोलिसांकडे आज वर्ग करण्यात आलेय.
अनेकदा छोट्या मोठ्या आजारासाठी नागरिक डॉक्टरांच्या सल्या विना औषधोपचार घेत असतात. अनेकांना याचा लाभ होतो मात्र काहींच्या शरीरावर औषधांचे दुष्परिणाम सुद्धा होतात. यामुळे डॉक्टरांच्या सल्याविना औषधी घेणे नागरिकांनी टाळावे.