अ‍ॅपशहर

shiv sampark abhiyan : शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्याच दिवशी राडा, मुंबईतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी...

शिवसेनेने नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांना सक्रिय करून पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. पण या अभियानाच्या पहिल्याच दिवशी वर्धामध्ये राडा झाला आहे. विशेष म्हणजे मुंबईतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या सर्व वादावर खासदार कृपाल तुमाने यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2022, 11:44 am
वर्धा : शिवसंपर्क अभियानाच्या ( Shiv Sampark Abhiyan ) पहिल्याच दिवशी वर्धामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. शिवसंपर्क अभियानासाठी मुंबई येथून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समोरच शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात अनाधिकृतपणे प्रवेश करुन पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विश्रामगृहातील शासकीय मालमत्तेची तोडफोड केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी प्रकरणाची पूर्ण माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. गोंधळ घालणारा शिवसेना कार्यकर्ता हा मद्यप्राशन करून आला होता, अशी माहिती पक्षाचे खासदार कृपाल तुमाने ( krupal tumane ) यांनी दिलीय. खासदार कृपाल तुमाने येण्यापूर्वी ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sampark abhiyan shiv sena workers clash in vardha krupal tumane clarify
शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्याच दिवशी राडा, मुंबईतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी...


शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद दूर करणे, कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामात सक्रिय करण्यासाठी शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान चार दिवस चालणार असून जिल्ह्याच्या प्रत्येक भागातील शिवसेना कार्यकर्त्यांची भेट मुंबई येथून आलेले पदाधिकारी घेणार आहेत. विश्रामगृहात झालेल्या गोंधळाची माहिती मंगळवारी वरिष्ठांना देण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यावर कारवाई संदर्भात एक-दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती वर्ध्याचे शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख खासदार कृपाल तुमाने यांनी दिलीय.

वर्धा जिल्ह्यात शिवसेनेत अंतर्गत असलेला वाद सर्वश्रुत आहे. संपर्कप्रमुख अनंत गुढे यांनी केलेल्या नियुक्त्या नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिल्या आहे. अश्याच नियुक्तीवरून हा वाद झाला आणि याचे पर्यावसन तोडफोडीत झाले.

शेतकऱ्यांसाठी आमदार समीर कुणावार यांचे आमरण उपोषण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज