वर्धा : नदीत पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी दोन युवकांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तर दोन युवक बचावले आहे. घटना हिंगणघाट गलुक्याच्या हिवरा येथील नदीपात्रात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रुतीक नरेश पोखळे (२१) आणि संघर्ष चंदू लढे (१८) दोन्ही रा. पिपरी असे मृतक युवकांची नावे आहे. तर रणजित रामजी धाबर्डे (२८) आणि शुभम सुधाकर लढे (२६) हे दोघे बचावले आहे. रविवारी पिंपरी येथील रुतीक पोकळे, संघर्ष लढे, रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे चार जीवलग मित्र आजनसरा येथून दुचाकीने हिवरा गावात असलेल्या वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते. मात्र, या चौघा मित्रांना नदितील पाण्याचा अंदाज न आल्याने चारही युवक नदीत बुडाले.
घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदू लढे या दोघांचे मृतदेह नदीपात्रा बाहेर काढण्यात आले. तर रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे दोघे बचावले आहे. या दुर्देवी घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुतीक नरेश पोखळे (२१) आणि संघर्ष चंदू लढे (१८) दोन्ही रा. पिपरी असे मृतक युवकांची नावे आहे. तर रणजित रामजी धाबर्डे (२८) आणि शुभम सुधाकर लढे (२६) हे दोघे बचावले आहे. रविवारी पिंपरी येथील रुतीक पोकळे, संघर्ष लढे, रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे चार जीवलग मित्र आजनसरा येथून दुचाकीने हिवरा गावात असलेल्या वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते. मात्र, या चौघा मित्रांना नदितील पाण्याचा अंदाज न आल्याने चारही युवक नदीत बुडाले.
घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदू लढे या दोघांचे मृतदेह नदीपात्रा बाहेर काढण्यात आले. तर रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे दोघे बचावले आहे. या दुर्देवी घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.