म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर ‘आर्थिक परिस्थिती आणि स्पर्धा परीक्षा यांचा काहीच संबंध असत नाही. जिद्द, चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते. स्पर्धा परीक्षेचा पाया हा दहावीनंतर रचला जाऊ शकतो. चौफर वाचन, फिटनेस, शिक्षकांचे मार्गदर्शन, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे. यश मिळवण्याचे धेय्य ठेवा, कोणतीही परीक्षा अवघड नाही’, असा कानमंत्र एमपीएससीतर्फे विक्रीकर निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिला.
प्रत्येक जण पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होईल, असे नाही. मात्र त्यासाठी निराशा आणि आत्मविश्वास गमाविता कामा नये. कारण कोणतीही गोष्ट प्रयत्नपूर्वक केल्यास त्यात हमखास यश मिळते. दहावीनंतर आयुष्यातील दोन ते तीन वर्षे महत्वाची आहे. या वर्षांचे महत्व जाणून घेतल्यास स्पर्धा परीक्षा काहीच अवघड नाही. घरची स्थिती बेताची आहे. घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षेत यश मिळविता येते असे अजिंक्य आजगेकर याने सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही, असा गैरसमज दूर करावा. अभ्यासाची अनेक साधने उपलब्ध झाली आहे. वाचनालये, इंटरनेटसह स्पर्धा परीक्षांची पुस्तके सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकतात. दररोज तीन ते चार तास अभ्यास केला.नेमकेपणाने अभ्यास केल्यास अधिक तणाव कधीच जाणविला नाही. घरची परिस्थिती बेताची होती. मात्र यश मिळविण्यासाठी परिस्थितीवर मात केल्यास कोणतेही यश सहजपणे मिळू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात टॅलेट आहे. त्यांनी हे टॅलेट बाहेर काढण्याची गरज आहे असे प्रमोद भोपळेने सांगितले.
परीक्षा जवळ आली की दिवस रात्र अभ्यास ही पद्धत विद्यार्थ्यांनी सोडून द्यावी. या प्रकारच्या पद्धतीने केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. त्याचा फायदाही होत नाही. विक्रीकर निरीक्षक पदासाठी तीन वेळा प्रयत्न केला. मात्र तीनही वेळा यश मिळाले नाही. यश मिळत नसले तरी आत्मविश्वास आणि जिद्द सोडली नाही. त्यासाठी कुटुंबांचे मोठे सहकार्य लाभले. दोन वेळा केलेल्या प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक परीक्षेच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. केवळ पूर्व परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मुख्य परीक्षेचा अभ्यास करीत नाहीत. ही पद्धत चुकीची आहे. त्यांनी सातत्याने अभ्यास केल्यास यश सहजपणे मिळते असे सारिका शिर्केने सांगितले.
पेपर क्रमांक एक मराठी आणि इंग्रजी अभ्यासक्रम आणि पेपर क्रमांक दोन सामान्य अध्ययन आणि बुद्धीमत्ता चाचणी अभ्यासक्रमची पहिल्यापासूनच तयारी केली. दोनशे गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहायक या दोन्ही परीक्षांसाठी अभ्यासक्रमात समानता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चौफर अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ पाठांतरवर भर देऊन अभ्यास केला, असे चालणार नाही. कोणताही विषय आणि एखादा घटक समजला नसल्यास त्याचे निरसन होईपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. सातत्याने वाचनाची सवय अत्यंत महत्वाची आहे असे राजवर्धन पाटीलने सांगितले.
मी हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथे वडिलांचे निधन झाल्यानंतरच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्यये बाळगले. आर्थिक परिस्थिती बेताची होती. काही वेळेला नोकरी शोधण्यासाठी मित्रांकडून पैसे घेतले. इंग्रजी माध्यमाची पदवी घेतली. त्यापूर्वी डीटीएड पूर्ण करून वडगाव येथे खासगी शाळेत नोकरी केली. समाजकल्याण विभागाची परीक्षा देऊन रत्नागिरी येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयात लिपीक म्हणून रुजू झालो. दुसऱ्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही असे शशिकांत मानेने सांगितले.
स्पर्धा परीक्षेची नाहक भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीनंतर स्पर्धा परीक्षा नको, असा बहुतांशी विद्यार्थ्यांचा सूर आहे. ही भीती मनातून काढून टाकल्यास स्पर्धा परीक्षेत यश सहजपणे मिळू शकते. सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे. विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश मिळविण्यासाठी बारावीनंतर प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध वृत्तपत्रांचे वाचन महत्वाचे आहे. अनेक वृत्तपत्रांचे वाचन स्पर्धा परीक्षेसाठी वरदान आहे. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे असे सुशांत भास्करने सांगितले. केवळ पाठांतर केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळते असे नाही. कारण पाठांतर केल्यास त्याचे आकलन महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे नियोजन अत्यावश्यक आहे. दिवसभर अभ्यासाच्या तासांचे नियोजन महत्वाचे आहे. नोकरी आणि व्यवसाय करुनही स्पर्धा परीक्षा देणे सहज शक्य आहे. त्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. बारा आणि पंधरा तास अभ्यास करावा, असे नाही. नेमका आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते असे सुजाता जाधवने सांगितले.
प्रत्येक जण पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होईल, असे नाही. मात्र त्यासाठी निराशा आणि आत्मविश्वास गमाविता कामा नये. कारण कोणतीही गोष्ट प्रयत्नपूर्वक केल्यास त्यात हमखास यश मिळते. दहावीनंतर आयुष्यातील दोन ते तीन वर्षे महत्वाची आहे. या वर्षांचे महत्व जाणून घेतल्यास स्पर्धा परीक्षा काहीच अवघड नाही. घरची स्थिती बेताची आहे. घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षेत यश मिळविता येते असे अजिंक्य आजगेकर याने सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही, असा गैरसमज दूर करावा. अभ्यासाची अनेक साधने उपलब्ध झाली आहे. वाचनालये, इंटरनेटसह स्पर्धा परीक्षांची पुस्तके सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकतात. दररोज तीन ते चार तास अभ्यास केला.नेमकेपणाने अभ्यास केल्यास अधिक तणाव कधीच जाणविला नाही. घरची परिस्थिती बेताची होती. मात्र यश मिळविण्यासाठी परिस्थितीवर मात केल्यास कोणतेही यश सहजपणे मिळू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात टॅलेट आहे. त्यांनी हे टॅलेट बाहेर काढण्याची गरज आहे असे प्रमोद भोपळेने सांगितले.
परीक्षा जवळ आली की दिवस रात्र अभ्यास ही पद्धत विद्यार्थ्यांनी सोडून द्यावी. या प्रकारच्या पद्धतीने केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. त्याचा फायदाही होत नाही. विक्रीकर निरीक्षक पदासाठी तीन वेळा प्रयत्न केला. मात्र तीनही वेळा यश मिळाले नाही. यश मिळत नसले तरी आत्मविश्वास आणि जिद्द सोडली नाही. त्यासाठी कुटुंबांचे मोठे सहकार्य लाभले. दोन वेळा केलेल्या प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक परीक्षेच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. केवळ पूर्व परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मुख्य परीक्षेचा अभ्यास करीत नाहीत. ही पद्धत चुकीची आहे. त्यांनी सातत्याने अभ्यास केल्यास यश सहजपणे मिळते असे सारिका शिर्केने सांगितले.
पेपर क्रमांक एक मराठी आणि इंग्रजी अभ्यासक्रम आणि पेपर क्रमांक दोन सामान्य अध्ययन आणि बुद्धीमत्ता चाचणी अभ्यासक्रमची पहिल्यापासूनच तयारी केली. दोनशे गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहायक या दोन्ही परीक्षांसाठी अभ्यासक्रमात समानता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चौफर अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ पाठांतरवर भर देऊन अभ्यास केला, असे चालणार नाही. कोणताही विषय आणि एखादा घटक समजला नसल्यास त्याचे निरसन होईपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. सातत्याने वाचनाची सवय अत्यंत महत्वाची आहे असे राजवर्धन पाटीलने सांगितले.
मी हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथे वडिलांचे निधन झाल्यानंतरच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्यये बाळगले. आर्थिक परिस्थिती बेताची होती. काही वेळेला नोकरी शोधण्यासाठी मित्रांकडून पैसे घेतले. इंग्रजी माध्यमाची पदवी घेतली. त्यापूर्वी डीटीएड पूर्ण करून वडगाव येथे खासगी शाळेत नोकरी केली. समाजकल्याण विभागाची परीक्षा देऊन रत्नागिरी येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयात लिपीक म्हणून रुजू झालो. दुसऱ्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही असे शशिकांत मानेने सांगितले.
स्पर्धा परीक्षेची नाहक भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीनंतर स्पर्धा परीक्षा नको, असा बहुतांशी विद्यार्थ्यांचा सूर आहे. ही भीती मनातून काढून टाकल्यास स्पर्धा परीक्षेत यश सहजपणे मिळू शकते. सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे. विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश मिळविण्यासाठी बारावीनंतर प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध वृत्तपत्रांचे वाचन महत्वाचे आहे. अनेक वृत्तपत्रांचे वाचन स्पर्धा परीक्षेसाठी वरदान आहे. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे असे सुशांत भास्करने सांगितले. केवळ पाठांतर केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळते असे नाही. कारण पाठांतर केल्यास त्याचे आकलन महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे नियोजन अत्यावश्यक आहे. दिवसभर अभ्यासाच्या तासांचे नियोजन महत्वाचे आहे. नोकरी आणि व्यवसाय करुनही स्पर्धा परीक्षा देणे सहज शक्य आहे. त्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. बारा आणि पंधरा तास अभ्यास करावा, असे नाही. नेमका आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते असे सुजाता जाधवने सांगितले.