अ‍ॅपशहर

प्रवेश विलंबाचा नाहक त्रास

अकरावी प्रवेश विलंबाचा अभ्याक्रमाला फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने यात गांभीर्याने लक्ष घालून प्रवेश प्रक्रिया सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात संपणारी असावी, ज्याने करून मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.

Maharashtra Times 24 Jul 2016, 12:00 am
अकरावी प्रवेश विलंबाचा अभ्याक्रमाला फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने यात गांभीर्याने लक्ष घालून प्रवेश प्रक्रिया सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात संपणारी असावी, ज्याने करून मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
प्रवेश विलंबाचा नाहक त्रास


विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी

अकरावी प्रवेशाबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यायला हवा. प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होत असल्यामुळे मुलांना अभ्यासाला वेळ कमी मिळतो. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, याची सरकारने दखल घ्यावी. त्यासाठी आवश्यक तरतूद करावी.- निखिल लोटणकर

...तर मुलांचा वेळ वाचेल!

अहोरात्र मेहनत करून मुले चांगल्या गुणांनी पास होतात. मात्र प्रवेशावरून त्यांना सगळ्याच कॉलेजचे हेलपाटे मारावे लागतात. एवढे करूनही मनासारखे कॉलेज मिळत नाही. या प्रवेश प्रक्रियेतच कित्येक दिवस उलटतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया नियोजनबद्ध वेळेत असावी.- सुमित गुजर

प्रवेश प्रक्रिया सोपी हवी

प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने ऑनलाइन नवीन प्रक्रिया सुरू केली. मात्र ही सुविधा योग्य आहे का, याबाबत त्यांनी मुलांचे मत लक्षात घ्यायला हवे होते. याच जास्त वेळ जात आहे. प्रवेश प्रक्रिया सोप्या पद्धतीने व्हावी.

- अस्मिता ठिगळे

नाराजीमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष

अकरावी अभ्यासक्रमावर बारावीचे वर्ष अवलंबून असते. किचकट प्रक्रियेमुळे मुलांचा बहुतांश वेळ वाया जातो. त्यात हवे असलेले कॉलेज न मिळाल्याने मुले नाराज होतात. त्यामुळे प्रवेश विलंबामुळे आणि आवडीचे कॉलेज न मिळाल्यामुळे मुलांचे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. - गौरव क्षीरसागर

सरकारने लक्ष द्यायला हवे

प्रवेश प्रक्रियेतील सावळागोंधळ रोखण्यासाठी सरकार योग्य पावले उचलत आहे, हे आनंददायी आहे. मात्र या प्रवेश प्रक्रियेच्या विलंबामुळे मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नसल्याबाबत खेदही आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, जेणे करून शिक्षण सुलभ होईल.- आकाश चव्हाण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज