अ‍ॅपशहर

बेस्ट बंद पडू नये

बेस्टचा आर्थिक डोलारा कोसळल्याने ४२ हजार अधिकारी-कर्मचारी फेब्रुवारीच्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. ही स्थिती ओढविण्यास बेस्ट समितीतील आतापर्यंतचे सर्व सत्ताधारी, प्रशासन, युनियन असे सर्वच घटक जबाबदार आहे. मात्र तरीही बेस्ट हे सर्वसामान्यांचे वाहन असल्याने ही सेवा बंद पडू नये, अशी मुंबईकरांची भूमिका आहे.

Maharashtra Times 16 Mar 2017, 12:25 am
बेस्टचा आर्थिक डोलारा कोसळल्याने ४२ हजार अधिकारी-कर्मचारी फेब्रुवारीच्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. ही स्थिती ओढविण्यास बेस्ट समितीतील आतापर्यंतचे सर्व सत्ताधारी, प्रशासन, युनियन असे सर्वच घटक जबाबदार आहे. मात्र तरीही बेस्ट हे सर्वसामान्यांचे वाहन असल्याने ही सेवा बंद पडू नये, अशी मुंबईकरांची भूमिका आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
बेस्ट बंद पडू नये


बेस्ट वाचायला हवी!

बेस्टकडे पगारासाठीही रक्कम शिल्लक नसण्याची नामुष्की आली आहे. ही वित्तीय दुरवस्थेमुळे निर्माण झालेली स्थिती आहे. या उपक्रमाकडे वेळीच लक्ष दिले असते, तर हा प्रकार झाला नसता. मुंबई पालिका आणि सरकारने ही सेवा वाचविण्यासाठी कठोर पावले उचलायला हवीत.- नारायण सावंत

नामुष्कीस कारणीभूत कोण?

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जाणीवपूर्वक संपुष्टात आणली जात आहे, असा ग्रह निर्माण होत आहे. बेस्ट हे सामान्यांचे वाहन आहे, ही यंत्रणा टिकण्याची गरज आहे. त्याचवेळी बेस्टची आर्थिक स्थिती बिघडण्यामागील कारणांचाही विचार करायला हवा. - प्रशांत नाईक

कठोर निर्णय हवेत

लोकलपाठोपाठ बेस्ट हे महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. या यंत्रणेचा तोटा वाढत असताना बेस्ट समिती सदस्य, प्रशासन, अधिकारी नेमके काय करत होते? बेस्टचे जहाज बुडत असल्यास त्यास वाचविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेतल्यास बेस्ट वाचेल.- विशाल महाडे

दोष शोधा

बेस्टवर ओढवलेली स्थिती लाजिरवाणी आहे. त्यास कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांची चौकशी झाली पाहिजे. सरकारने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमून निविदा, खरेदी, अंतर्गत लेखाजोखा यांची तपासणी केली पाहिजे. सर्वच घटकांचा शोध घेतल्यास दोष सापडतील.- सचिन सूर्यवंशी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज