शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे लोन देशभरात पसरत आहेत. या आंदोलनाने काही दिवसांपासून महाराष्ट्र ढवळून काढला होता. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र तसे करतानाच भूमिहीन आणि छोट्या शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळणे आवश्यक आहे, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.
सधन शेतकऱ्यांचे हित नको
यूपीए सरकारने यापूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. त्यातील अनेक मखलाशी नंतर समोर आल्या. अशावेळी ही कर्जमाफी देताना छोटा शेतकरी वर्ग मागे राहता कामा नये. केवळ सधन शेतकऱ्यांचे भले होणार नाही, हे सरकारने प्रामुख्याने पाहावे. - केतकी खोत
प्रश्न समजून घ्यावेत
अन्न ही प्राथमिक गरज असून ते पिकविणाऱ्या शेतकरी वर्गाचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे. शेतकरी एकत्र आल्याने उशिरा का होईना सरकारला त्यांची दखल घेणे भाग पडले. पण आता सरकारने त्याची जाहिरात करू नये. - संदीप सावंत
भविष्याचाही विचार करावा
शेतकरी ज्या ज्वलंत प्रश्नांना तोंड देतात, त्याचा भविष्याच्या दृष्टीने विचार करावा लागेल. केवळ घोषणा करून वा तत्कालिक योजना जाहीर करून काहीही होणार नाही. निसर्गावर आधारित शेती, भूमिहीन शेतकरी, मजूर अशा पद्धतीने विचार करायला हवा. - महेंद्र पाटील
इतर उपाय योजावेत
सरकारी बँकेकडील कर्ज माफ केले तरीही सावकारी कर्ज घेतले जाते. शेतीतील अडचणी वाढत चालल्या आहेत. केवळ समित्या नेमून काहीही होत नाही. अशाप्रकारचे प्रश्न नव्याने निर्माण न होण्याच्या दृष्टीने काय करता येईल, हे पाहिले पाहिजे. - मिलिंद सुतार
यंत्रणेतील दोष दूर करा
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताना केवळ आर्थिकदृष्ट्या विचार करून चालणार नाही. अन्य अंगानींही विचार करायला हवा. पाण्याचे नियोजन हा महत्त्वाचा घटक आहे. केवळ पावसावर आधारित शेती हे स्वरूप बदलण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल. त्यादृष्टीनेही सरकारने उपाययोजना करावी.- भूपेश पाटील
सधन शेतकऱ्यांचे हित नको
यूपीए सरकारने यापूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. त्यातील अनेक मखलाशी नंतर समोर आल्या. अशावेळी ही कर्जमाफी देताना छोटा शेतकरी वर्ग मागे राहता कामा नये. केवळ सधन शेतकऱ्यांचे भले होणार नाही, हे सरकारने प्रामुख्याने पाहावे. - केतकी खोत
प्रश्न समजून घ्यावेत
अन्न ही प्राथमिक गरज असून ते पिकविणाऱ्या शेतकरी वर्गाचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे. शेतकरी एकत्र आल्याने उशिरा का होईना सरकारला त्यांची दखल घेणे भाग पडले. पण आता सरकारने त्याची जाहिरात करू नये. - संदीप सावंत
भविष्याचाही विचार करावा
शेतकरी ज्या ज्वलंत प्रश्नांना तोंड देतात, त्याचा भविष्याच्या दृष्टीने विचार करावा लागेल. केवळ घोषणा करून वा तत्कालिक योजना जाहीर करून काहीही होणार नाही. निसर्गावर आधारित शेती, भूमिहीन शेतकरी, मजूर अशा पद्धतीने विचार करायला हवा. - महेंद्र पाटील
इतर उपाय योजावेत
सरकारी बँकेकडील कर्ज माफ केले तरीही सावकारी कर्ज घेतले जाते. शेतीतील अडचणी वाढत चालल्या आहेत. केवळ समित्या नेमून काहीही होत नाही. अशाप्रकारचे प्रश्न नव्याने निर्माण न होण्याच्या दृष्टीने काय करता येईल, हे पाहिले पाहिजे. - मिलिंद सुतार
यंत्रणेतील दोष दूर करा
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताना केवळ आर्थिकदृष्ट्या विचार करून चालणार नाही. अन्य अंगानींही विचार करायला हवा. पाण्याचे नियोजन हा महत्त्वाचा घटक आहे. केवळ पावसावर आधारित शेती हे स्वरूप बदलण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल. त्यादृष्टीनेही सरकारने उपाययोजना करावी.- भूपेश पाटील