अ‍ॅपशहर

चक्का जामचा पर्याय

आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आक्रमक झाली आहे. या समितीने आज, सोमवारी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. यातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Maharashtra Times 14 Aug 2017, 6:53 am
आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आक्रमक झाली आहे. या समितीने आज, सोमवारी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. यातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
चक्का जामचा पर्याय


सरकार गंभीर नाही

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. सरकारने यासंदर्भात संपूर्ण माहिती घेत योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा. - हरिश्चंद्र चाळके

शेतकऱ्यांचे काय चुकले?

पावसावर आधारित शेतीमुळे अनेकदा अडचणी येतात. जास्त वा कमी पावसामुळे शेतीचे नुकसान होते. त्यात, शेतकरी भरडून जात असल्याचे वारंवार दिसते. ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी शेतविषयक धोरणात बदल होण्याची गरज आहे. - हरीश ढगे

आंदोलनाची तीव्रता वाढली

देशभरातील शेतकऱ्यांनी नानाविध अडचणींमुळे आंदोलन पुकारले होते. त्यातून अद्याप मार्ग निघालेला नाही. राज्यातही कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. या प्रकारामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. - चेतन चव्हाण

शेतकऱ्यांना प्राधान्य हवे

शेतकऱ्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. शेतमजूर, छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या संपुष्टात येण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे धोरण आखले गेले पाहिजे. केवळ एक ते दोन वर्षांचा विचार न करता भविष्याचा विचार व्हावा. - गौरव यादव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज