जयश्री एडगांवकर
अगदी लहानपणापासून मला लहान मुलांची आवड होती. गरवारे बालभवनचा कोर्स केला आणि तिथेच नोकरी मिळाली. मुलांना शिकवण्याचं आवडीचं काम मिळालं आहे. त्यामुळे खूप आनंद झाला. हळूहळू तिथे शिकवणाऱ्या ताईंशी मैत्री झाली. मग मीही त्यांच्या ग्रुपमध्ये सामावले गेले. आम्ही सर्वजणी बालभवन सुटल्यावर तिथल्या कट्ट्यावर गप्पा मारत बसायचो. खूप धमाल करायचो. कधी घरून काहीतरी पदार्थ न्यायचो, तर कधीतरी समोरच सारसबागेत शेवपुरी, भेळ खायचो. छोटीशी गोष्ट झाली, तरी पार्टी म्हणून खायचो. हसणं, खिदळणं, चेष्टा सर्वच करायचो आणि खूप ऊर्जा भरून घेऊन घरी जायचो.
हळूहळू काही कारणांनी आम्ही एकेक जणींनी बालभवन सोडलं; पण आमची घट्ट मैत्री आम्हाला काही स्वस्थ बसू देत नव्हती. प्रत्यक्षात आमचं प्रत्येकीचं वय वेगळं होतं. त्यामुळे प्रत्येकीच्या अडचणी वेगळ्या. कोणाची मुलं खूपच लहान होती. मग आम्ही ठरवलं, की महिन्यातून एकदा तरी भेटून भिशी करायची. आता ज्यातून आम्हाला ऊर्जा मिळत होती, तो आमचा मैत्री कट्टा पुन्हा नव्याने सुरू झाला. आमच्या मैत्रीकट्ट्याच्या जागा खूप वेगळ्या असायच्या. कधी बागेतली भिशी, तर कधी घरची, तर कधी सहलीची भिशी... अशाप्रकारे खूप धमाल सुरू केली आणि आता आमच्या मैत्रीला २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. अजूनही आमचा मैत्रीकट्टा तितक्याच उत्साहानं चालू आहे; कारण मैत्रीला वय नसतं.
आम्हा मैत्रिणींचं अगदी तसंच आहे. आमच्या ग्रुपमध्ये अनुपमाताईंचं वय ७० च्या घरात आहे. मीरा आणि उल्का आहेत ६० ते ६५ च्या घरातल्या, तर मी, अपर्णा आणि अंजू आहोत ४५ ते ५० च्या घरातले; पण आमच्या या वयामुळे आमच्या मैत्रिणीला कोणताच अडथळा नाही. अनुपमाताई सर्वांत मोठ्या असल्या, तरी आम्ही त्यांची चेष्टासुद्धा करतो आणि त्यांची काळजीही घेतो. वेळ पडली, तर त्या आम्हाला सल्लेही देतात आणि यालाच तर मैत्री म्हणतात. प्रत्येकीच्या आनंदात आणि दुःखात आम्ही नेहमीच सहभागी असतो. त्यामुळे वयानं मोठ्या मैत्रिणींच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होतो, तर आमच्या अनुभवातून त्यांना त्यांच्या सुनांचा अंदाज येतो.
अशा आमच्या मैत्रीच्या कट्ट्यातून आम्ही खूप काही वेचतो. आनंदाचे क्षण, प्रेम, धमाल, मस्ती सर्व काही ऊर्जा देणारं असतं. ती ऊर्जा महिन्यातून एकदा गोळा करतो. एकमेकींवर भरभरून प्रेम करतो, चेष्टा करतो, भांडतो आणि पुन्हा एकत्र येतो. अशा आमच्या मैत्रीच्या कट्ट्याची पंचविशी आम्ही एकसारख्या साड्या घेऊन आणि पार्टी करून साजरी केली.
अगदी लहानपणापासून मला लहान मुलांची आवड होती. गरवारे बालभवनचा कोर्स केला आणि तिथेच नोकरी मिळाली. मुलांना शिकवण्याचं आवडीचं काम मिळालं आहे. त्यामुळे खूप आनंद झाला. हळूहळू तिथे शिकवणाऱ्या ताईंशी मैत्री झाली. मग मीही त्यांच्या ग्रुपमध्ये सामावले गेले. आम्ही सर्वजणी बालभवन सुटल्यावर तिथल्या कट्ट्यावर गप्पा मारत बसायचो. खूप धमाल करायचो. कधी घरून काहीतरी पदार्थ न्यायचो, तर कधीतरी समोरच सारसबागेत शेवपुरी, भेळ खायचो. छोटीशी गोष्ट झाली, तरी पार्टी म्हणून खायचो. हसणं, खिदळणं, चेष्टा सर्वच करायचो आणि खूप ऊर्जा भरून घेऊन घरी जायचो.
हळूहळू काही कारणांनी आम्ही एकेक जणींनी बालभवन सोडलं; पण आमची घट्ट मैत्री आम्हाला काही स्वस्थ बसू देत नव्हती. प्रत्यक्षात आमचं प्रत्येकीचं वय वेगळं होतं. त्यामुळे प्रत्येकीच्या अडचणी वेगळ्या. कोणाची मुलं खूपच लहान होती. मग आम्ही ठरवलं, की महिन्यातून एकदा तरी भेटून भिशी करायची. आता ज्यातून आम्हाला ऊर्जा मिळत होती, तो आमचा मैत्री कट्टा पुन्हा नव्याने सुरू झाला. आमच्या मैत्रीकट्ट्याच्या जागा खूप वेगळ्या असायच्या. कधी बागेतली भिशी, तर कधी घरची, तर कधी सहलीची भिशी... अशाप्रकारे खूप धमाल सुरू केली आणि आता आमच्या मैत्रीला २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. अजूनही आमचा मैत्रीकट्टा तितक्याच उत्साहानं चालू आहे; कारण मैत्रीला वय नसतं.
आम्हा मैत्रिणींचं अगदी तसंच आहे. आमच्या ग्रुपमध्ये अनुपमाताईंचं वय ७० च्या घरात आहे. मीरा आणि उल्का आहेत ६० ते ६५ च्या घरातल्या, तर मी, अपर्णा आणि अंजू आहोत ४५ ते ५० च्या घरातले; पण आमच्या या वयामुळे आमच्या मैत्रिणीला कोणताच अडथळा नाही. अनुपमाताई सर्वांत मोठ्या असल्या, तरी आम्ही त्यांची चेष्टासुद्धा करतो आणि त्यांची काळजीही घेतो. वेळ पडली, तर त्या आम्हाला सल्लेही देतात आणि यालाच तर मैत्री म्हणतात. प्रत्येकीच्या आनंदात आणि दुःखात आम्ही नेहमीच सहभागी असतो. त्यामुळे वयानं मोठ्या मैत्रिणींच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होतो, तर आमच्या अनुभवातून त्यांना त्यांच्या सुनांचा अंदाज येतो.
अशा आमच्या मैत्रीच्या कट्ट्यातून आम्ही खूप काही वेचतो. आनंदाचे क्षण, प्रेम, धमाल, मस्ती सर्व काही ऊर्जा देणारं असतं. ती ऊर्जा महिन्यातून एकदा गोळा करतो. एकमेकींवर भरभरून प्रेम करतो, चेष्टा करतो, भांडतो आणि पुन्हा एकत्र येतो. अशा आमच्या मैत्रीच्या कट्ट्याची पंचविशी आम्ही एकसारख्या साड्या घेऊन आणि पार्टी करून साजरी केली.