अ‍ॅपशहर

जमलं मैत्रीचं ट्युनिंग

चार वर्षांपूर्वी धुळवडीच्या दिवशी पाण्यात भिजून आणि रंग उडवून झाल्यावर आम्ही १०-१२ जणी आमच्या दादरच्या अमृतकुंभ सोसायटीमधल्या एका कट्ट्यावर स्थिरावलो. मग एका मैत्रिणीने थंडाई आणि दुसरीने भजी आणली. हास्य आणि गप्पांना नुसता ऊत आला. हळूहळू गट्टी झाल्यावर मधून-मधून जमायचं असं ठरलं. असं करता-करता आता संख्या बारावर आली आहे. तर असा आमचा सखी कट्टा भरभक्कम व्हायला लागला. सोसायटीच्या दीपोत्सवात ड्रेसकोड ठरवून त्याप्रमाणे नटून-थटून आम्ही सगळ्याजणी जमतो.आता ग्रुप म्हटलं की, थोडे रुसवे-फुगवे हे असणारच, पण ते सगळं तात्पुरतं असतं.

Maharashtra Times 28 Aug 2017, 12:26 am
अमिता पटवर्धन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dance to the rhytham of friendship
जमलं मैत्रीचं ट्युनिंग


चार वर्षांपूर्वी धुळवडीच्या दिवशी पाण्यात भिजून आणि रंग उडवून झाल्यावर आम्ही १०-१२ जणी आमच्या दादरच्या अमृतकुंभ सोसायटीमधल्या एका कट्ट्यावर स्थिरावलो. मग एका मैत्रिणीने थंडाई आणि दुसरीने भजी आणली. हास्य आणि गप्पांना नुसता ऊत आला. हळूहळू गट्टी झाल्यावर मधून-मधून जमायचं असं ठरलं. असं करता-करता आता संख्या बारावर आली आहे. तर असा आमचा सखी कट्टा भरभक्कम व्हायला लागला. सोसायटीच्या दीपोत्सवात ड्रेसकोड ठरवून त्याप्रमाणे नटून-थटून आम्ही सगळ्याजणी जमतो.
आता ग्रुप म्हटलं की, थोडे रुसवे-फुगवे हे असणारच, पण ते सगळं तात्पुरतं असतं. त्यावर्षी मग सगळ्यांचे वाढदिवस वर्षभर दणक्यात हॉटेलमध्ये जाऊन तर कधी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर साजरे झाले. पण सगळ्याच संसारी आणि लेकुरवाळ्या, त्यामुळे पुढे-पुढे बाहेर जाणं जमेनासं झालं. बरं प्रत्येकीचं कार्यक्षेत्र निरनिराळं, कुणाची कथ्थक नृत्याची संस्था, तर कुणी शिक्षणक्षेत्रात अग्रेसर, कुणी बँकेत तर कुणी मुलांच्या संस्कार वर्ग घेणारं तर कुणी नाटकात काम करणारं. पण अशी वेगवेगळी क्षेत्रं असूनसुद्धा सगळ्यांचं ट्युनिंग खूपचं छान जमतं. एकमेकींना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. मग आम्ही सगळ्या एकाच सोसायटीत राहत असल्यामुळे दररोज रात्री दहा वाजल्यानंतर सगळ्याजणी भेटतो. एकीने फक्त व्हॉट्सअॅवर टाकायचं आणि ज्यांना जमेल त्यांनी कट्ट्यावर यायचं.
आम्हाला झटपट पुलाव कसा करायचा येथपासून ते पंढरीचा वारी, राजकारण यापैकी कुठलाच विषय वर्ज्य नाही. त्यामुळे दोन-तीन तास कसे निघून जातात हे कळतंच नाही आणि मन कसं ताजेतवानं होतं! हल्लीच्या युगात एकमेकांना (अगदी नातेवाईकांनासुद्धा) भेटणं विरळंच होत चाललंय. पण अशा गप्पांमुळे एकमेकींची सुख-दु:ख वाटली जातात. एकमेकींचे अनुभव शेअर केले जातात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज