ते मंतरलेले दिवस
माझं बालपण नायगाव येथील पोलीस वसाहतीतील जी ब्लॉकमध्ये गेलं. बालपणात जी धमाल केली आहे ती न विसरता येण्यासारखी आहे.
Maharashtra Times 27 Jul 2016, 5:22 am
राजू तेंडुलकर, ठाणे
माझं बालपण नायगाव येथील पोलीस वसाहतीतील जी ब्लॉकमध्ये गेलं. शालेय शिक्षण घेताना बालपणात जे अनुभव आले ते कधीही विसरू शकत नाही. सत्तरीतील ते दिवस फारच नटखट होते. त्यावेळी माझे समवयस्क मित्र मंगेश, अभय घाग, अवि शिंदे, दिलीप आयरे, अनिल मांजरेकर, भगवान, विश्वनाथ उतेकर, चंदु घाग आणि केशव परब यांनी लहानपणी जी धमाल केली आहे ती न विसरता येण्यासारखी आहे. आमच्या इमारतीमध्ये जेव्हा सत्यनारायणाची पूजा असायची तेव्हा आम्ही एकत्र इमारतीची साफसफाई करायचो, पताका बांधणं आणि तत्सम कामं करायचो. त्या काळी इमारतीत पडद्यावर चित्रपट दाखवण्याची पध्दत होती. चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत-जास्त लोक यावेत म्हणून त्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी संपूर्ण नायगाव विभागात रस्त्यावर खडूने चित्रपटाविषयी लिहवून ठेवायचो. तेव्हा जो आनंद व्हायचा तो अविस्मरणीय आहे.
काही काळानंतर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आम्ही साईबाबांचा देव्हारा बांधला. तिथं प्रत्येक गुरुवारी गाजावाजा करत आम्ही साईबाबांची आरती म्हणायचो. कालांतराने १९९२ साली मी नायगाव सोडून डोंबिवलीला स्थायिक झालो. माझे सर्व मित्र आज वयस्कर झालेले आहेत. हल्ली सत्यनारायणाच्या पूजेची सर्व जबाबदारी इमारतीतील धनाजी, शशी पाटील, समीर, आशिष, ओंकार, सिद्धू, राजा आणि इतर तरुणांनी घेतलेली आहे. मात्र आता पूर्वीसारखे चित्रपट दाखवायचे दिवस निघून गेले. त्याएवजी हल्ली महिला आणि मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. उदा. संगीत खुर्ची, चमचा गोटी, सुई दोरा, डान्स वगैरे स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या सर्वांमध्ये डान्सचा जो कार्यक्रम होतो तो फारच अवर्णनीय असतो. हल्ली बिल्डिंगमध्ये साई भंडारा केला जातो. त्यात अभय घाग याचा सिंहाचा वाटा असतो. बिल्डिंगमधील माझे मित्र आजही मला न विसरता सत्यनारायण पूजेचं आमंत्रण देतात आणि मी पण आवर्जुन हजेरी लावतो. त्यामुळे निदान वर्षातून एकदा तरी सर्व मित्रांना भेटण्याची संधी मिळते आणि तो आनंद अवर्णनीय असतो. मला कायम आठवणीत ठेवणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना माझा मनापासून सलाम.
माझं बालपण नायगाव येथील पोलीस वसाहतीतील जी ब्लॉकमध्ये गेलं. शालेय शिक्षण घेताना बालपणात जे अनुभव आले ते कधीही विसरू शकत नाही. सत्तरीतील ते दिवस फारच नटखट होते. त्यावेळी माझे समवयस्क मित्र मंगेश, अभय घाग, अवि शिंदे, दिलीप आयरे, अनिल मांजरेकर, भगवान, विश्वनाथ उतेकर, चंदु घाग आणि केशव परब यांनी लहानपणी जी धमाल केली आहे ती न विसरता येण्यासारखी आहे. आमच्या इमारतीमध्ये जेव्हा सत्यनारायणाची पूजा असायची तेव्हा आम्ही एकत्र इमारतीची साफसफाई करायचो, पताका बांधणं आणि तत्सम कामं करायचो. त्या काळी इमारतीत पडद्यावर चित्रपट दाखवण्याची पध्दत होती. चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत-जास्त लोक यावेत म्हणून त्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी संपूर्ण नायगाव विभागात रस्त्यावर खडूने चित्रपटाविषयी लिहवून ठेवायचो. तेव्हा जो आनंद व्हायचा तो अविस्मरणीय आहे.
काही काळानंतर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आम्ही साईबाबांचा देव्हारा बांधला. तिथं प्रत्येक गुरुवारी गाजावाजा करत आम्ही साईबाबांची आरती म्हणायचो. कालांतराने १९९२ साली मी नायगाव सोडून डोंबिवलीला स्थायिक झालो. माझे सर्व मित्र आज वयस्कर झालेले आहेत. हल्ली सत्यनारायणाच्या पूजेची सर्व जबाबदारी इमारतीतील धनाजी, शशी पाटील, समीर, आशिष, ओंकार, सिद्धू, राजा आणि इतर तरुणांनी घेतलेली आहे. मात्र आता पूर्वीसारखे चित्रपट दाखवायचे दिवस निघून गेले. त्याएवजी हल्ली महिला आणि मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. उदा. संगीत खुर्ची, चमचा गोटी, सुई दोरा, डान्स वगैरे स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या सर्वांमध्ये डान्सचा जो कार्यक्रम होतो तो फारच अवर्णनीय असतो. हल्ली बिल्डिंगमध्ये साई भंडारा केला जातो. त्यात अभय घाग याचा सिंहाचा वाटा असतो. बिल्डिंगमधील माझे मित्र आजही मला न विसरता सत्यनारायण पूजेचं आमंत्रण देतात आणि मी पण आवर्जुन हजेरी लावतो. त्यामुळे निदान वर्षातून एकदा तरी सर्व मित्रांना भेटण्याची संधी मिळते आणि तो आनंद अवर्णनीय असतो. मला कायम आठवणीत ठेवणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना माझा मनापासून सलाम.