राधा देसाई- दणाईत, मुलुंड
गिरगाव प्रार्थना समाज येथील राम सोहन इंग्लिश स्कूलच्या १९७३ सालच्या बॅचचे आम्ही विद्यार्थी बहुतेक सर्वजण उपनगरात स्थलांतरित झाले तर विद्यार्थिनी विवाहानंतर सासरी गेल्या. तेव्हा फोन सर्वांकडे नसल्यामुळे संपर्क होत नव्हता. आमच्यातल्या ग्रँटरोड येथील विश्वास नागेशकरने अनेकांचे फोन नंबर्स मिळवले. फेसबुकवर अनेक जणांचा शोध लागला. त्यातल्या निलेश कोठारेने आमचा व्हॉट्सअॅपचा ग्रुप बनवला. शेवटी आम्ही १५-१६ जणांनी गेट टुगेदर करण्याचे निश्चित केलं.
पुण्याहून कलिका पटणी, अभय देशपांडे, जयश्री आवळकर, वर्षा दांडेकर येणार होते, म्हणून पूर्व उपनगरातल्या १८ सप्टेंबर, २०१६ रोजी मुलुंड येथील एका हॉटेलमध्ये भेट ठरवली. तोपर्यंत व्हॉट्सअॅपवर गप्पा अखंड चालू होत्या. सर्वजणच उतावीळ झाले होते. भेटीच्या वेळेस मोठा केक आणला होता तो कापला. इतक्या वर्षांनीही आम्ही एकमेकांना ओळखलं. गळ्यात पडून आम्ही सर्वजणींनी खूप गप्पा मारल्या, पोटभर चेष्टामस्करी केली, खूप हसलो. जणू काळ ४३ वर्षांपूर्वीच्या बालपणात आम्हाला घेऊन गेला आणि तिथेच थांबला. आम्ही नित्याचे आयुष्य विसरून शाळेच्या आठवणींमध्ये आकंठ बुडालो. चेहरे बदललेले असले तरी आमचे भावबंध तेच जुने होते. सर्वजण आपापल्या आयुष्यात समृद्ध जीवन जगताना पाहून आम्हाला समाधान वाटलं.
त्यानंतर प्रत्येकाचा साठावा वाढदिवस आम्ही सर्व एकत्र साजरा करत आलो आहोत. तसंच महिन्यातून एकदा तरी आम्ही भेटतोच. एकदा तीन दिवस पुणेकरांबरोबर पुण्याला मनसोक्त आनंदाने घालवले. आता उर्वरित आयुष्यात आमच्या या ग्रुपमधील सर्व मित्रमैत्रिणींना एकमेकांचा अक्षय सहवास, आधार आणि प्रेम उत्तरोत्तर लाभो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना.
गिरगाव प्रार्थना समाज येथील राम सोहन इंग्लिश स्कूलच्या १९७३ सालच्या बॅचचे आम्ही विद्यार्थी बहुतेक सर्वजण उपनगरात स्थलांतरित झाले तर विद्यार्थिनी विवाहानंतर सासरी गेल्या. तेव्हा फोन सर्वांकडे नसल्यामुळे संपर्क होत नव्हता. आमच्यातल्या ग्रँटरोड येथील विश्वास नागेशकरने अनेकांचे फोन नंबर्स मिळवले. फेसबुकवर अनेक जणांचा शोध लागला. त्यातल्या निलेश कोठारेने आमचा व्हॉट्सअॅपचा ग्रुप बनवला. शेवटी आम्ही १५-१६ जणांनी गेट टुगेदर करण्याचे निश्चित केलं.
पुण्याहून कलिका पटणी, अभय देशपांडे, जयश्री आवळकर, वर्षा दांडेकर येणार होते, म्हणून पूर्व उपनगरातल्या १८ सप्टेंबर, २०१६ रोजी मुलुंड येथील एका हॉटेलमध्ये भेट ठरवली. तोपर्यंत व्हॉट्सअॅपवर गप्पा अखंड चालू होत्या. सर्वजणच उतावीळ झाले होते. भेटीच्या वेळेस मोठा केक आणला होता तो कापला. इतक्या वर्षांनीही आम्ही एकमेकांना ओळखलं. गळ्यात पडून आम्ही सर्वजणींनी खूप गप्पा मारल्या, पोटभर चेष्टामस्करी केली, खूप हसलो. जणू काळ ४३ वर्षांपूर्वीच्या बालपणात आम्हाला घेऊन गेला आणि तिथेच थांबला. आम्ही नित्याचे आयुष्य विसरून शाळेच्या आठवणींमध्ये आकंठ बुडालो. चेहरे बदललेले असले तरी आमचे भावबंध तेच जुने होते. सर्वजण आपापल्या आयुष्यात समृद्ध जीवन जगताना पाहून आम्हाला समाधान वाटलं.
त्यानंतर प्रत्येकाचा साठावा वाढदिवस आम्ही सर्व एकत्र साजरा करत आलो आहोत. तसंच महिन्यातून एकदा तरी आम्ही भेटतोच. एकदा तीन दिवस पुणेकरांबरोबर पुण्याला मनसोक्त आनंदाने घालवले. आता उर्वरित आयुष्यात आमच्या या ग्रुपमधील सर्व मित्रमैत्रिणींना एकमेकांचा अक्षय सहवास, आधार आणि प्रेम उत्तरोत्तर लाभो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना.