अ‍ॅपशहर

दृढ मैत्रीचा संकल्प

आम्ही बालमोहनकर १९८७ दहावी-फ मधून बाहेर पडलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावलो. तीन वर्षांपूर्वी आमच्यापैकी संदिप देशमुखने व्हॉट्सअॅपचा ग्रुप बनवला. जसाजसा मित्रमैत्रिणींचा पत्ता लागला, तसतसे ते ग्रुपमध्ये अॅड झाले. ग्रुपचे नामकरण केले 'दिल दोस्ती दुनियादारी उर्फ थ्रीडी'. आज सगळे मिळून आम्ही ५० जण या ग्रुपवर आहोत.साधारण ७-८ महिन्यांपूर्वी मयुरा साहनी ही ग्रूपमध्ये आली.

Maharashtra Times 28 Oct 2017, 12:41 am
डॉ. नीता शिंदे-दळवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम friendship unlimited
दृढ मैत्रीचा संकल्प


आम्ही बालमोहनकर १९८७ दहावी-फ मधून बाहेर पडलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावलो. तीन वर्षांपूर्वी आमच्यापैकी संदिप देशमुखने व्हॉट्सअॅपचा ग्रुप बनवला. जसाजसा मित्रमैत्रिणींचा पत्ता लागला, तसतसे ते ग्रुपमध्ये अॅड झाले. ग्रुपचे नामकरण केले 'दिल दोस्ती दुनियादारी उर्फ थ्रीडी'. आज सगळे मिळून आम्ही ५० जण या ग्रुपवर आहोत.
साधारण ७-८ महिन्यांपूर्वी मयुरा साहनी ही ग्रूपमध्ये आली. आमची ही मैत्रीण किर्ती महाविद्यालयात विज्ञानाची प्रोफेसर होती. पण दुर्दैवाने २००७ मध्ये तिचा अपघात झाला आणि तिला अंपगत्व आलं. वर्गातील काही मित्रमंडळी तिला भेटायला गेली होती. मयुरा आमच्याबरोबर एकत्र कुठेच फिरायला किंवा पिकनिकला येऊ शकणार नव्हती. दरम्यान तेजसच्या डोक्यात एक कल्पना आली. तो म्हणाला, 'आपण २१ मेला मयुराचा वाढदिवस तिच्या घरी जाऊन साजरा करूया आणि तिला सरप्राइज देऊया'. अमलाने सगळ्यांना मयुरासाठी मेसेज लिहिण्यास सांगितले. एक मोठ्ठं ग्रीटिंग कार्ड घेऊन त्यावर ते मेसेजच्या चिठ्ठ्या लावल्या. सगळ्या मित्र-मैत्रिणींचे छोटे-छोटे फोटो कापून बदामाच्या आकारात कार्डवर चिकटवले. २० मेला संदिपने मयुराला फोन करून सांगितलं की तो, मनीष आणि वैशाली उद्या वाढदिवसाला तुझ्या घरी येतोय.
आम्ही अखेर २१ मेच्या संध्याकाळी शिवाजी पार्कला एकत्र जमलो. ठरलेले तिघे मयुराकडे गेले. नंतर केक, बटाटे वडे, फुलं, ग्रीटिंग कार्ड आणि मयुराचा आवडता म्हैसूरपाक घेऊन आम्ही अर्ध्या तासाने मयुराकडे पोहोचलो. इतक्या सगळ्यांना पाहून तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आम्ही २७ जण होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची आमची पहिलीच वेळ होती. आमच्यापैकी बरेच जण चक्क तीस वर्षांनी मयुराला भेटत होते. सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. मंदार व राजसने अमेरिकेतून व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून मयुराला शुभेच्छा दिल्या. 'इतकी वर्षं आम्ही घरातल्या घरात ४-५ जणांसोबत माझा वाढदिवस साजरा करायचो. आज पहिल्यांदाच मी इतक्या सगळ्यांबरोबर वाढदिवस साजरा करतेय! मला हे तर स्वप्न असल्याचा भास होतोय', असं मयुरा म्हणाली. अशाप्रकारे दिवसेंदिवस आमची मैत्री दृढ होत आहे. आमच्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज