>> उषा कणेकर, बोरिवली
दोन वर्षांपूर्वी म्हणजे १५ नोव्हेंबर २०१४ ला बोरिवलीच्या चोगले शाळेचे १९७२ च्या अकरावीचे विद्यार्थी तब्बल ४२ वर्षांनी एकत्र जमले. याचं श्रेय नंदकिशोर देशपांडे आणि जयश्री धर्माधिकारी (पूर्वीची विद्या करंबेळकर) यांना जातं. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी आम्हाला एकत्र आणलं. या कार्यक्रमास पुण्याहून अनिल, अरुणा आणि उदय, रत्नागिरीहून अविनाश आणि गोव्याहून विवेक आले होते. अभिमानाने सांगावंसं वाटतं की, ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत हे आमचे वर्गमित्र आहेत. हाँगकाँग स्थित आमची मैत्रीण रोहिणी हिला या सोहळ्यात व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमाद्वारे सहभागी होण्याची व्यवस्था केली होती.
त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजता आम्ही भेटलो. प्रथम आम्हाला कायमचं सोडून गेलेल्या वर्गबंधू, भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रम सुरु झाला. विद्याने प्रत्येकाची मोजक्या शब्दात ओळख करुन देऊन त्यांना मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं. प्रत्येकालाच काय आणि किती बोलू असं झालं होतं. काहींना तर भावना अनावर झाल्या. आमच्या ग्रुप लीडरने तयार केलेल्या गेमपेक्षा गप्पांमध्येच सर्वजण रमले. साधारण दहा वाजत आले तरी कोणाला जेवायचं भान नव्हतं. आमच्या ग्रुप लीडरने आम्हा सर्वांना शाळेची आठवण म्हणून सुंदर कॉफी मग दिला. विवेकने सर्वांना गोव्याचे काजू भेट म्हणून दिले.
सोहळ्याची आठवण म्हणून एक मुलगा आणि मुलगी यांना देण्यासाठी दोन ट्रॉफी आणल्या होत्या. मुलांनी एकमताने मुलीचं नाव सुचवायचं आणि मुलीने मुलाचे. सर्वानुमते आमच्या ग्रुप लीडरची नावं योग्य ठरली आणि त्यांना ट्रॉफी दिली. या गेट टूगेदर पुरतं न थांबता त्यानंतरसाठी पूर्ण केलेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आमच्या या शेलेदारांनी साठी साजरी केली. त्यांनी केलेल्या कौतुकाचं अप्रूप काही औरच. प्रत्यक्ष भेटत नसलो तरी दररोज व्हॉट्सअॅपमुळे भेट होतेच. सहलीचं आयोजन होतं. आत्ताच काहीजण गोव्याला जाऊन आले. आताच्या मैत्रीतमधली खंडित ४२ वर्षं पुसून गेलीत. आमची ही मैत्री अशीच अखंड राहो, ही इश्वरचरणी प्रार्थना.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे १५ नोव्हेंबर २०१४ ला बोरिवलीच्या चोगले शाळेचे १९७२ च्या अकरावीचे विद्यार्थी तब्बल ४२ वर्षांनी एकत्र जमले. याचं श्रेय नंदकिशोर देशपांडे आणि जयश्री धर्माधिकारी (पूर्वीची विद्या करंबेळकर) यांना जातं. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी आम्हाला एकत्र आणलं. या कार्यक्रमास पुण्याहून अनिल, अरुणा आणि उदय, रत्नागिरीहून अविनाश आणि गोव्याहून विवेक आले होते. अभिमानाने सांगावंसं वाटतं की, ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत हे आमचे वर्गमित्र आहेत. हाँगकाँग स्थित आमची मैत्रीण रोहिणी हिला या सोहळ्यात व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमाद्वारे सहभागी होण्याची व्यवस्था केली होती.
त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजता आम्ही भेटलो. प्रथम आम्हाला कायमचं सोडून गेलेल्या वर्गबंधू, भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रम सुरु झाला. विद्याने प्रत्येकाची मोजक्या शब्दात ओळख करुन देऊन त्यांना मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं. प्रत्येकालाच काय आणि किती बोलू असं झालं होतं. काहींना तर भावना अनावर झाल्या. आमच्या ग्रुप लीडरने तयार केलेल्या गेमपेक्षा गप्पांमध्येच सर्वजण रमले. साधारण दहा वाजत आले तरी कोणाला जेवायचं भान नव्हतं. आमच्या ग्रुप लीडरने आम्हा सर्वांना शाळेची आठवण म्हणून सुंदर कॉफी मग दिला. विवेकने सर्वांना गोव्याचे काजू भेट म्हणून दिले.
सोहळ्याची आठवण म्हणून एक मुलगा आणि मुलगी यांना देण्यासाठी दोन ट्रॉफी आणल्या होत्या. मुलांनी एकमताने मुलीचं नाव सुचवायचं आणि मुलीने मुलाचे. सर्वानुमते आमच्या ग्रुप लीडरची नावं योग्य ठरली आणि त्यांना ट्रॉफी दिली. या गेट टूगेदर पुरतं न थांबता त्यानंतरसाठी पूर्ण केलेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आमच्या या शेलेदारांनी साठी साजरी केली. त्यांनी केलेल्या कौतुकाचं अप्रूप काही औरच. प्रत्यक्ष भेटत नसलो तरी दररोज व्हॉट्सअॅपमुळे भेट होतेच. सहलीचं आयोजन होतं. आत्ताच काहीजण गोव्याला जाऊन आले. आताच्या मैत्रीतमधली खंडित ४२ वर्षं पुसून गेलीत. आमची ही मैत्री अशीच अखंड राहो, ही इश्वरचरणी प्रार्थना.