डॉ. अजित विष्णू साळवी
ताडदेवच्या युसूफ मेहेरअली विद्यालयातून १९८१ साली आम्ही एसएससी उत्तीर्ण झालो. वर्गातील बहुतांश विद्यार्थी एका खोलीच्या घरातून आलेले. परंतु आमचा १०वी/बचा वर्ग हा शिक्षण, खेळ व शिस्त या सर्वच बाबतीत त्या वेळी आदर्श वर्ग म्हणून गणला जायचा. आम्ही काही विद्यार्थी अगदी पहिली ते दहावीपर्यंत एकाच तुकडीमध्ये असल्याने सर्वांचे ऋणानुबंध घट्ट होते. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न व पुढील विकासाच्या दृष्टीने जवळजवळ सर्व विद्यार्थी दहिसर, डोंबिवली ते अगदी चिपळूणपर्यंत विखुरले गेले आणि फारच कमी मित्रमंडळींचा संपर्क राहिला.
२०१६मध्ये आमच्या ग्रुपमधील सर्वच जण पन्नाशी पुरी करणार असल्याने सर्वांचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव मंदाने ठेवला व त्यानिमित्ताने सर्वजण भेटणार या आनंदात सर्वांनी मनापासून मान्यता दिली. लगेच जयश्रीने वांगणी येथील रिसॉर्टमध्ये ओळखीने बुकिंग केलं. मी स्वतः मुलं विरुद्ध मुली असा लंगडी सामना खेळण्याचा प्रस्ताव मांडला. जयश्रीने तिची बालमैत्रीण व बेंचवरील जोडीदार स्मिताची भेट व्हावी, यासाठी देवाला साकडं घातलं.
तेव्हा २५ जूनला पावसाने जोरदार हजेरी लावली आणि थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण सर्वांच्या मनामध्ये एकमेकांना भेटण्याच्या इच्छेने या सर्वांवर मात केली. सुषमा चिपळूणातून बारा तासांच्या अथक प्रवास करून ताडदेवला २५ तारखेला दाखल झाली. सर्वांना आनंदाचं भरतं आल्याने आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या. आमच्या ग्रुपचा इतिहास व पिकनिकचे प्रयोजन ऐकून सावंतवाडी रिसॉर्टचे मालक सावंत काका भारावून गेले. ते स्वतः आमच्या समारंभात उत्स्फूर्तपणे सामील तर झालेच पण त्यांनी जादूचे प्रयोग दाखवून ५० वर्षं वयाच्या आम्हा सर्व बाल विद्यार्थ्यांचे खरोखरंच मनोरंजन केलं.
अमिताने आणलेला केक सर्वांनी सामूहिकरीत्या कापला तेव्हाचा उत्साह पाहण्यासारखा होता. हे सर्व होत असताना शाळेमध्ये अजिबात तोंड न उघडणाऱ्या स्मिताने आपल्या शब्दांच्या फटक्यांनी सर्वांना पोट धरून हसवलं. स्मिताचे वेगळे रूप पाहून सर्वजण अवाक झाले. त्यानंतर प्रत्येकाचं पुष्पगुच्छ व पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आपल्याच मित्रमंडळींकडून सत्कार स्वीकारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून रेकॉर्ड केला. त्यानंतर सर्वांनी तरण तलाव, रेन डान्स व नदीमध्ये पाय सोडून पाण्याचा आनंद घेतला. घरी परत जाताना प्रत्येकजण नक्कीच खूप दिवस पुरतील एवढ्या गोड आठवणी घेऊन गेला.
ताडदेवच्या युसूफ मेहेरअली विद्यालयातून १९८१ साली आम्ही एसएससी उत्तीर्ण झालो. वर्गातील बहुतांश विद्यार्थी एका खोलीच्या घरातून आलेले. परंतु आमचा १०वी/बचा वर्ग हा शिक्षण, खेळ व शिस्त या सर्वच बाबतीत त्या वेळी आदर्श वर्ग म्हणून गणला जायचा. आम्ही काही विद्यार्थी अगदी पहिली ते दहावीपर्यंत एकाच तुकडीमध्ये असल्याने सर्वांचे ऋणानुबंध घट्ट होते. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न व पुढील विकासाच्या दृष्टीने जवळजवळ सर्व विद्यार्थी दहिसर, डोंबिवली ते अगदी चिपळूणपर्यंत विखुरले गेले आणि फारच कमी मित्रमंडळींचा संपर्क राहिला.
२०१६मध्ये आमच्या ग्रुपमधील सर्वच जण पन्नाशी पुरी करणार असल्याने सर्वांचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव मंदाने ठेवला व त्यानिमित्ताने सर्वजण भेटणार या आनंदात सर्वांनी मनापासून मान्यता दिली. लगेच जयश्रीने वांगणी येथील रिसॉर्टमध्ये ओळखीने बुकिंग केलं. मी स्वतः मुलं विरुद्ध मुली असा लंगडी सामना खेळण्याचा प्रस्ताव मांडला. जयश्रीने तिची बालमैत्रीण व बेंचवरील जोडीदार स्मिताची भेट व्हावी, यासाठी देवाला साकडं घातलं.
तेव्हा २५ जूनला पावसाने जोरदार हजेरी लावली आणि थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण सर्वांच्या मनामध्ये एकमेकांना भेटण्याच्या इच्छेने या सर्वांवर मात केली. सुषमा चिपळूणातून बारा तासांच्या अथक प्रवास करून ताडदेवला २५ तारखेला दाखल झाली. सर्वांना आनंदाचं भरतं आल्याने आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या. आमच्या ग्रुपचा इतिहास व पिकनिकचे प्रयोजन ऐकून सावंतवाडी रिसॉर्टचे मालक सावंत काका भारावून गेले. ते स्वतः आमच्या समारंभात उत्स्फूर्तपणे सामील तर झालेच पण त्यांनी जादूचे प्रयोग दाखवून ५० वर्षं वयाच्या आम्हा सर्व बाल विद्यार्थ्यांचे खरोखरंच मनोरंजन केलं.
अमिताने आणलेला केक सर्वांनी सामूहिकरीत्या कापला तेव्हाचा उत्साह पाहण्यासारखा होता. हे सर्व होत असताना शाळेमध्ये अजिबात तोंड न उघडणाऱ्या स्मिताने आपल्या शब्दांच्या फटक्यांनी सर्वांना पोट धरून हसवलं. स्मिताचे वेगळे रूप पाहून सर्वजण अवाक झाले. त्यानंतर प्रत्येकाचं पुष्पगुच्छ व पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आपल्याच मित्रमंडळींकडून सत्कार स्वीकारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून रेकॉर्ड केला. त्यानंतर सर्वांनी तरण तलाव, रेन डान्स व नदीमध्ये पाय सोडून पाण्याचा आनंद घेतला. घरी परत जाताना प्रत्येकजण नक्कीच खूप दिवस पुरतील एवढ्या गोड आठवणी घेऊन गेला.