अ‍ॅपशहर

आनंद पुनर्भेटीचा

आम्ही विरार येथील अ. व. स्मारक विद्यामंदिर शाळेतील एसएससी (अकरावी) १९७१ बॅचचे विद्यार्थी. तब्बल ४६​ ​वर्षानंतर प्रथमच आम्ही एकत्र आलो आणि योगायोगाने अगदी बरोबर ४६ विद्यार्थी जमलो होतो. ​इतक्या वर्षानंतर आपल्या शाळेच्या मित्र-मैत्रिणींना भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झाल्याचं जाणवत होतं.

Maharashtra Times 27 Jun 2017, 6:31 pm
जयप्रकाश चौधरी​, विरार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reunion of friends
आनंद पुनर्भेटीचा


आम्ही विरार येथील अ. व. स्मारक विद्यामंदिर शाळेतील एसएससी (अकरावी) १९७१ बॅचचे विद्यार्थी. तब्बल ४६​ ​वर्षानंतर प्रथमच आम्ही एकत्र आलो आणि योगायोगाने अगदी बरोबर ४६ विद्यार्थी जमलो होतो. ​इतक्या वर्षानंतर आपल्या शाळेच्या मित्र-मैत्रिणींना भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झाल्याचं जाणवत होतं. सर्वप्रथम आम्ही आमच्या दिवंगत शिक्षकांना आणि आमच्या दिवंगत वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सर्वांनी आपली ओळख करुन दिली. कारण सगळ्यांचेच चेहरे बऱ्यापैकी बदलले होते. सगळेच निवृत्त असल्यामुळे आता काय काय करतात ते सांगितलं. शाळेत केलेल्या गमतीजमती सांगितल्या. त्या आठवणी ऐकताना प्रत्येकालाच आपण परत एकदा शाळेत जावं असं वाटलं. तेव्हाच्या गमती-जमती ऐकताना आता या वयात हसू आवरत नव्हतं.
प्रत्येकानं वयाची साठी ओलांडली असली तरी संगीत खुर्चीसारखा खेळ सगळे जण खेळले. तसंच काही जणांनी पोहण्याचाही आनंद लुटला. या वयातही सगळ्यांचा उत्साह अगदी दांडगा आहे, हे पाहून खूप बरं वाटलं. प्रत्येकालाच किती आणि काय बोलू असं झालं होतं. कुणालाही ते ८-९ तास कसे पटकन गेले कळलंच नाही. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण चुरी, दामोदर चौधरी, परमानंद देसाई, चंपा मांगेला, कविता चुरी यांनी मेहनत घेतली आणि स्नेहाने संयोजनाची धुरा सांभाळली. प्रदीर्घ काळानंतर पुनर्भेटीचा आनंद मनात घेऊन, लवकरच परत भेटण्याचं वचन देऊन, जड अंत:करणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज