सुनेत्रा अभ्यंकर, भांडुप
औरंगाबाद येथीर शारदा मंदिर कन्याशाळेच्या आम्ही मैत्रिणी आहोत. ३-४ जणी २००८ पासून संपर्कात होतो. २०१५ला संसारातून थोड्या मुक्त झाल्यावर इतरांची आठवण आली. मग काय स्मार्ट फोनच्या व मुलांच्या सहाय्याने सोळा जणी पुन्हा एकदा जमलो. पहिल्यांदा माहेरी औरंबादला भेटून सर्व ओळखीच्या पण आता अनोळखी वाटणाऱ्या जागा बघून पुढच्या भेटीचं ठरवलं. यंदा मुंबईत विसावा रिसॉर्टमध्ये भेटायचं ठरवलं. गेल्यावर्षी तेराजणी होतो, यंदा अठरा झालो. शोध मोहीम अजूनही चालूच आहे.
भेटलो तेव्हा नवीन सामिल झालेल्यांना बघून आनंद झाला. सर्वजणींनी संसारीक कर्तव्ये पूर्ण केलेली आहेत. मात्र भेटल्याबरोबर हरखुनच गेलो आणि बघता-बघता गळ्यात हात टाकून शारदा मंदिरच्या ग्राऊंडवर पोहोचलो. पण पीटीच्या भागवत बाईंनी रुजवलेला आत्मविश्वास आयुष्यभर कामास आला. मुख्याध्यापिका वैशंपायनबाई अतिशय कडक शिस्तीच्या होत्या. पण तेवढ्याच प्रेमळपण! सर्वच शिक्षिकांची आठवण आली.
वय घरीच ठेवल्याने सारं सोप्प झालं होतं. कोणतंच बंधन न ठेवता लहानपणीच्या केलेला खोडकरपणा आठवून हसत राहिलो. मधली इतकी वर्षं का भेटलो नाही याची थोडी खंतही वाटली. पण हे सारं बाजूला ठेवून आता तरी भेटलो याचा आनंद घ्यायचा ठरवलं. सगळी दुखणी विसरून नाच, गाणी, गरबा खेळलो आणि पुढच्या वर्षी भेटण्याचा वायदा केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मुलामुलींनी खूप छान साथ दिली. मदत केली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. विसावा रिसॉर्टमधील सगळ्यांनी आमचं माहेरपणचं केलं, असं बोलणं वावगं ठरणार नाही. पुन्हा भेटायचं ठरवून मैत्रीची शिदोरी, उत्साह व आनंद घेऊन स्वप्न रंगवत घरी परतलो.
औरंगाबाद येथीर शारदा मंदिर कन्याशाळेच्या आम्ही मैत्रिणी आहोत. ३-४ जणी २००८ पासून संपर्कात होतो. २०१५ला संसारातून थोड्या मुक्त झाल्यावर इतरांची आठवण आली. मग काय स्मार्ट फोनच्या व मुलांच्या सहाय्याने सोळा जणी पुन्हा एकदा जमलो. पहिल्यांदा माहेरी औरंबादला भेटून सर्व ओळखीच्या पण आता अनोळखी वाटणाऱ्या जागा बघून पुढच्या भेटीचं ठरवलं. यंदा मुंबईत विसावा रिसॉर्टमध्ये भेटायचं ठरवलं. गेल्यावर्षी तेराजणी होतो, यंदा अठरा झालो. शोध मोहीम अजूनही चालूच आहे.
भेटलो तेव्हा नवीन सामिल झालेल्यांना बघून आनंद झाला. सर्वजणींनी संसारीक कर्तव्ये पूर्ण केलेली आहेत. मात्र भेटल्याबरोबर हरखुनच गेलो आणि बघता-बघता गळ्यात हात टाकून शारदा मंदिरच्या ग्राऊंडवर पोहोचलो. पण पीटीच्या भागवत बाईंनी रुजवलेला आत्मविश्वास आयुष्यभर कामास आला. मुख्याध्यापिका वैशंपायनबाई अतिशय कडक शिस्तीच्या होत्या. पण तेवढ्याच प्रेमळपण! सर्वच शिक्षिकांची आठवण आली.
वय घरीच ठेवल्याने सारं सोप्प झालं होतं. कोणतंच बंधन न ठेवता लहानपणीच्या केलेला खोडकरपणा आठवून हसत राहिलो. मधली इतकी वर्षं का भेटलो नाही याची थोडी खंतही वाटली. पण हे सारं बाजूला ठेवून आता तरी भेटलो याचा आनंद घ्यायचा ठरवलं. सगळी दुखणी विसरून नाच, गाणी, गरबा खेळलो आणि पुढच्या वर्षी भेटण्याचा वायदा केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मुलामुलींनी खूप छान साथ दिली. मदत केली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. विसावा रिसॉर्टमधील सगळ्यांनी आमचं माहेरपणचं केलं, असं बोलणं वावगं ठरणार नाही. पुन्हा भेटायचं ठरवून मैत्रीची शिदोरी, उत्साह व आनंद घेऊन स्वप्न रंगवत घरी परतलो.