अ‍ॅपशहर

काटकसरी अन् समंजस

आमचं लग्न १३ मे १९७०ला झालं. मी मुंबई मनपामध्ये सुरक्षा रक्षक या पदावर नोकरीस होतो. कमी पगारात स्वत:च्या घरात संसार थाटणं शक्य नसल्याने पत्नीला गावी रहावं लागलं. तिनेही समंजसपणा दाखवला व माझ्या आईची सेवा करण्याची संधी मिळाल्याचं सुख मानून काही वर्ष गावी राहिली.

Maharashtra Times 28 Apr 2017, 12:29 am
शिवाजी सोनवणे, मुलुंड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a letter to my better half
काटकसरी अन् समंजस


आमचं लग्न १३ मे १९७०ला झालं. मी मुंबई मनपामध्ये सुरक्षा रक्षक या पदावर नोकरीस होतो. कमी पगारात स्वत:च्या घरात संसार थाटणं शक्य नसल्याने पत्नीला गावी रहावं लागलं. तिनेही समंजसपणा दाखवला व माझ्या आईची सेवा करण्याची संधी मिळाल्याचं सुख मानून काही वर्ष गावी राहिली. पुढे तिच्या पायगुणाने मॅट्रीक आणि मनपाच्या अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या पगारात थोडी वाढ झाली. या काळात आम्हाला तीन मुलं झाली. त्यांना घेऊन मी मुंबईत एका छोट्या घरात संसार थाटला. महागाई, तिन्ही मुलांची शिक्षणं, तुटपुंजा पगार अशा प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पत्नीने कधीही कसलीच तक्रार न करता सोशिकपणे आणि काटकसरीने संसाराचा गाडा पुढे नेला. तिने मुलांना चांगलं वळण लावलं, त्याचाच परिणाम म्हणून तिन्ही मुलं उच्च शिक्षित झाली आणि आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत. आपापल्या कुटुंबासह सुखात नांदत आहे. तिच्या समंजसपणामुळे तिन्ही सुनादेखील तिला आईच मानतात आणि म्हातारपणात त्यांच्या आईवडिलांसारखी काळजी घेतात. हे केवळ माझ्या पत्नीच्या सोशिक, काटकसरी व समंजसपणाचं फळ आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज