अ‍ॅपशहर

​ बंध हे जन्मोजन्मीचे!

माणसाच्या जीवनात अनेक टप्पे असतात. लग्न हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. पूर्वी लग्न जमवणं फारसं कठीण नव्हतं. २९ वर्षांपूर्वी म्हणजे २० मार्च १९८८ रोजी माझं लग्न भिवंडी येथील आशा गडकरी हिच्याबरोबर थाटा माटात झालं. लग्नानंतर आशाचं नाव बदलून प्रिया जरी झालं तरी तिला सर्वजण आशा म्हणूनच हाक मारतात.

Maharashtra Times 11 Apr 2017, 12:39 am
दिलीप गडकरी, कर्जत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a strong bond we share
​ बंध हे जन्मोजन्मीचे!


माणसाच्या जीवनात अनेक टप्पे असतात. लग्न हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. पूर्वी लग्न जमवणं फारसं कठीण नव्हतं. २९ वर्षांपूर्वी म्हणजे २० मार्च १९८८ रोजी माझं लग्न भिवंडी येथील आशा गडकरी हिच्याबरोबर थाटा माटात झालं. लग्नानंतर आशाचं नाव बदलून प्रिया जरी झालं तरी तिला सर्वजण आशा म्हणूनच हाक मारतात. भिवंडीसारख्या मोठ्या शहरातून कर्जतसारख्या छोट्या गावात ही कशी रमेल? ती कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत नोकरी करत असल्याने कर्जत-कल्याण प्रवास कसा जमेल? ती आमच्या एकत्र कुटुंबात जमवून घेईल का? असे अनेक प्रश्न मनात यायचे. पण तिचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने आणि माझी मोठी वहिनी समजूतदार असल्याने दोघीजणी सख्ख्या बहिणीसारख्या राहू लागल्या. माझे वडील तसंच भाऊ, वहिनी, पुतणी यांना आशाने इतकं आपुलकीने वागवलं की, ती माहेरी गेली तर माझ्यापेक्षा घरचे जास्त बेचैन व्हायचे. तिलासुध्दा माहेरी करमायचं नाही.
आमच्या संसारवेलीवर लीना आणि सखी यांच्या रूपाने दोन फुलं उमलली. संसार, नोकरी आणि मुलींचं संगोपन करणं ही तारेवरची कसरत होती. पण आमच्या मोठ्या वहिनीने तिला मोलाची साथ दिली. त्यातच माझ्या वडिलांचं आजारपण यामुळे दोघींची धावपळ व्हायची. पण दोघीजणींनी आपापसात जबाबदारी वाटून घेतली. गेल्या २९ वर्षांत आशाने मला मोलाची साथ दिली. शक्यतो ती दूर जात नाही. पण दूर गेलीच तर सर्वजण बेचैन होतात आणि आल्यावर म्हणतात 'नसतेस घरी तू जेव्हा जीव वेडापिसा होतो'.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज