किशोर भावसार
समता माझी पत्नी आणि मी भुसावळ जिल्हा जळगाव येथील रहिवासी. माझे समता हिच्याशी १९९४ साली लग्न झालं. समता सोबत २३ वर्षं कधी गेली हे कळलंच नाही. माझ्या आई-वडिलांची सेवा करण्यास तिला फारच कमी अवधी मिळाला. वडील सात वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. त्यांचा उजवा हात व पाय निकामी झाला. माझ्या लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात त्याचं निधन झालं. त्या पाठोपाठ माझ्या आईचं निधन झालं. माझ्या पत्नीने त्यांची खूप सेवा केली. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. अगदी मुलीप्रमाणे दिवस रात्र सेवा केली.
मी खासगी कंपनीत नोकरी करतो. मी कामानिमित्त बाहेर गावी असल्यामुळे माझ्या पत्नीच घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. मुलांचे शिक्षण, संगोपन, संस्कार, त्यांच्या आवडीनिवडी, माझ्या आवडीनिवडी या सर्व गोष्टी ती चेहऱ्यावर सदैव स्मित ठेवून पार पाडीत असते. माझ्या नोकरीच्या व्यापामुळे मी सतत बाहेरगावी असल्यामुळे कधी-कधी वाद व्हायचे पण ती या सर्व अडचणीतून अलगदपणे मार्ग काढते, याचा अभिमान आहे.
आमच्या घर परिसरात, कॉलनीत तिला सर्व लहान, मोठे, वृद्ध मंडळी ताई म्हणून संबोधतात. तशी साहसी, धैर्य देणारी, दुसऱ्याचं दुःख आपलंच आहे असं समजणारी व त्यावर मात करणाऱ्या माझ्या लाडक्य समताविषयी मी आणखीन काय सांगू आणि नाही असं झालंय. समता एक आदर्श गृहिणी पण आहे. ब्युटी पार्लर, शिवण क्लासेस, रांगोळ्या, मेहंदी क्लासेस फावल्या वेळेत ती शिकवत असते व मला आर्थिक हातभार लावत असते. कुठल्याही प्रकारचे खाद्य पदार्थ, स्वयंपाक ती अगदी चविष्ट बनवते. त्यामुळे ती जेव्हा माहेरी किंवा बाहेरगावी जाते. तेव्हा मला करमत नाही. मुख्यत: जेवणाचे हाल होतात. तेव्हा तिला होत असलेल्या त्रास व कष्टाची जाणीव होते. खरंच ती जेव्हा घरी नसते तेव्हा एकटेपणा जाणवतो. संसाररुपी रथासाठी दोन चाकं असावी लागतात असं म्हणतात. माझ्यासाठी माझी पत्नी समताच संसार रुपी रथाची दोन चाके आहे, मी नाममात्र आहे. जन्मोजन्मी तिची सोबत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
समता माझी पत्नी आणि मी भुसावळ जिल्हा जळगाव येथील रहिवासी. माझे समता हिच्याशी १९९४ साली लग्न झालं. समता सोबत २३ वर्षं कधी गेली हे कळलंच नाही. माझ्या आई-वडिलांची सेवा करण्यास तिला फारच कमी अवधी मिळाला. वडील सात वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. त्यांचा उजवा हात व पाय निकामी झाला. माझ्या लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात त्याचं निधन झालं. त्या पाठोपाठ माझ्या आईचं निधन झालं. माझ्या पत्नीने त्यांची खूप सेवा केली. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. अगदी मुलीप्रमाणे दिवस रात्र सेवा केली.
मी खासगी कंपनीत नोकरी करतो. मी कामानिमित्त बाहेर गावी असल्यामुळे माझ्या पत्नीच घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. मुलांचे शिक्षण, संगोपन, संस्कार, त्यांच्या आवडीनिवडी, माझ्या आवडीनिवडी या सर्व गोष्टी ती चेहऱ्यावर सदैव स्मित ठेवून पार पाडीत असते. माझ्या नोकरीच्या व्यापामुळे मी सतत बाहेरगावी असल्यामुळे कधी-कधी वाद व्हायचे पण ती या सर्व अडचणीतून अलगदपणे मार्ग काढते, याचा अभिमान आहे.
आमच्या घर परिसरात, कॉलनीत तिला सर्व लहान, मोठे, वृद्ध मंडळी ताई म्हणून संबोधतात. तशी साहसी, धैर्य देणारी, दुसऱ्याचं दुःख आपलंच आहे असं समजणारी व त्यावर मात करणाऱ्या माझ्या लाडक्य समताविषयी मी आणखीन काय सांगू आणि नाही असं झालंय. समता एक आदर्श गृहिणी पण आहे. ब्युटी पार्लर, शिवण क्लासेस, रांगोळ्या, मेहंदी क्लासेस फावल्या वेळेत ती शिकवत असते व मला आर्थिक हातभार लावत असते. कुठल्याही प्रकारचे खाद्य पदार्थ, स्वयंपाक ती अगदी चविष्ट बनवते. त्यामुळे ती जेव्हा माहेरी किंवा बाहेरगावी जाते. तेव्हा मला करमत नाही. मुख्यत: जेवणाचे हाल होतात. तेव्हा तिला होत असलेल्या त्रास व कष्टाची जाणीव होते. खरंच ती जेव्हा घरी नसते तेव्हा एकटेपणा जाणवतो. संसाररुपी रथासाठी दोन चाकं असावी लागतात असं म्हणतात. माझ्यासाठी माझी पत्नी समताच संसार रुपी रथाची दोन चाके आहे, मी नाममात्र आहे. जन्मोजन्मी तिची सोबत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.