माधव पेंढारकर, मालाड
आज विचार करताना लक्षात आलं की ३९ वर्षं कशी गेली कळलंच नाही. खरंच तू क्वचितच माहेरी गेलीस आणि आजही त्या विचारानेच मी अस्वस्थ होतो. मोठी मुलगी आज चाळीशीला येऊन धाकटा मुलगा आणि सून आणि त्यांचा एक गोंडस मुलगा म्हणजे माझा-आमचा नातू बघता बघता ४ वर्षांचा झाला. पण आजही तुझी ओढ कायम आहे.
आता वयोमानानुसार तुझा विसरभोळेपणा पाहून कधी-कधी राग अनावर होतो. पण तुझं अस्तित्व वारंवार जाणवतं. अगदी सकाळी तू लवकर उठून चिरंजीवाचा डबा करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ कसा जातो तेच कळत नाही. मी कधी ठाकूरद्वारला तर कधी इतर ठिकाणी प्रवास चालू असतो. नातवाला शाळेत आणणं-नेणं चालू असतं. पण लक्ष मात्र तुझ्या ठायीच केंद्रीत असतं. त्यात तू कधी भाजी निवडण्यात तर कधी कपडे धुवून वाळत घालण्यात तासन्तास मग्न असतेस. जोडीला स्वयंपाक, शॉपिंग किंवा इतर कामात व्यस्त असूनही औषधांची साथ आपल्या दोघांच्या जीवनात आहेच.
अशा परिस्थितीतही तू कधी अर्ध्या-एक तासासाठी बाहेर गेलीस तरी घर सुन्न वाटतं तर नसण्याची कल्पनाही करवत नाही. आता मुलगा-सुनेपर्यंत आलो तरी तुझा विरह दिवसेंदिवस कठीणच आहे. केवळ एक ताससुद्धा सहन होत नाही आणि सांगता येत नाही. तर सदैव मी तुला गृहितच धरुन आहे. त्यामुळे म्हणावंसं वाटतं की हेही दिवस जातील.
आज विचार करताना लक्षात आलं की ३९ वर्षं कशी गेली कळलंच नाही. खरंच तू क्वचितच माहेरी गेलीस आणि आजही त्या विचारानेच मी अस्वस्थ होतो. मोठी मुलगी आज चाळीशीला येऊन धाकटा मुलगा आणि सून आणि त्यांचा एक गोंडस मुलगा म्हणजे माझा-आमचा नातू बघता बघता ४ वर्षांचा झाला. पण आजही तुझी ओढ कायम आहे.
आता वयोमानानुसार तुझा विसरभोळेपणा पाहून कधी-कधी राग अनावर होतो. पण तुझं अस्तित्व वारंवार जाणवतं. अगदी सकाळी तू लवकर उठून चिरंजीवाचा डबा करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ कसा जातो तेच कळत नाही. मी कधी ठाकूरद्वारला तर कधी इतर ठिकाणी प्रवास चालू असतो. नातवाला शाळेत आणणं-नेणं चालू असतं. पण लक्ष मात्र तुझ्या ठायीच केंद्रीत असतं. त्यात तू कधी भाजी निवडण्यात तर कधी कपडे धुवून वाळत घालण्यात तासन्तास मग्न असतेस. जोडीला स्वयंपाक, शॉपिंग किंवा इतर कामात व्यस्त असूनही औषधांची साथ आपल्या दोघांच्या जीवनात आहेच.
अशा परिस्थितीतही तू कधी अर्ध्या-एक तासासाठी बाहेर गेलीस तरी घर सुन्न वाटतं तर नसण्याची कल्पनाही करवत नाही. आता मुलगा-सुनेपर्यंत आलो तरी तुझा विरह दिवसेंदिवस कठीणच आहे. केवळ एक ताससुद्धा सहन होत नाही आणि सांगता येत नाही. तर सदैव मी तुला गृहितच धरुन आहे. त्यामुळे म्हणावंसं वाटतं की हेही दिवस जातील.