सुधाकर लेले, दहिसर
मी पूर्वी मौ. आगाशी, ता. वसई, जि. ठाणे येथे राहत होतो. माझं १९७५ला मुंबई येथील शैलजा वैद्य हिच्याबरोबर विवाह झाला आणि त्यानंतर तिने संगीता या नावाने आमच्या घरात प्रवेश केला. विवाहानंतर काही दिवस आम्ही आगाशी येथेच राहत होतो. त्यानंतर आम्ही एप्रिल १९७५मध्ये दहिसर येथे राहायला आलो. लग्नाच्या वेळी तिचं वय अवघे १९ वर्षं एवढं होतं. त्यामुळे तिला संसाराच्या कामातील काही माहिती नव्हती.
शेतीच्या कामानिमित्त आई-वडील शेतावर असत. पण त्यावेळी आमच्या आजीने तिला घरातील सर्व कामं शिकवली आणि त्याप्रमाणे ती त्या कामात पारंगत झाली. त्याबद्दल आजे सासू आणि सासू-सासरे यांनी कौतुक केलं. आमची आई शेतीच्या कामासाठी शेतावर असल्याने तिने तिच्या जागी उभं राहून आम्हा तिन्ही भावंडांचे जेवणाचे डबे वेळेवर पाठवण्यापासून सर्व काही व्यवस्थित केलं. तसंच माझी सरकारी नोकरी असल्याने माझा पगार बेताचाच होता. त्यामुळे संसाराला हातभार लावण्याच्या दृष्टीने लहान मुलं सांभाळणं, त्यांना शाळेत पाठवणं तसंच परत आल्यानंतर त्यांचं खाणं-पिणं करणं यासर्व गोष्टी तिने कोणतीही तक्रार न करता केल्या. तसंच शाळेतील शिक्षकांना डबे पाठवण्याचंही काम केलं. अशा पद्धतीने तिने संसाराला हातभार लावला. तिने हौस-मौजेचा कधीही आग्रह धरला नाही. नंतर मुलांनीही संसाराला हातभार लावला.
माझ्या दोन्ही भावांची लग्नकार्य होईपर्यंत तिने आईच्या जागी उभं राहून कोणतीही तक्रार न करता सर्व काही व्यवस्थित केलं. त्याप्रमाणे ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही त्यांनी तिला योग्य तो मान दिला, तिचा आदर केला. तसंच तिच्या दोन्ही जाऊ बाईंनीदेखील तिचा मान राखला. तसंच तिचे शेजारी-पाजारीदेखील संबंध चांगले होते.
मला दोन मुलं, दोन सुना आणि दोन नातू असून दोन्ही मुलं नोकरी-व्यवसाय करत असून त्यांचे संसार स्थिरावले आहेत. माझा संसार केवळ तिने दिलेल्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे होऊ शकला. अशातच १२ मे, २००७ रोजी तिचं दुःखद निधन झालं. प्रत्येक क्षणाला, सणावाराला, कोणत्याही घरगुती कार्यक्रमाच्या वेळी सर्वांना तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
मी पूर्वी मौ. आगाशी, ता. वसई, जि. ठाणे येथे राहत होतो. माझं १९७५ला मुंबई येथील शैलजा वैद्य हिच्याबरोबर विवाह झाला आणि त्यानंतर तिने संगीता या नावाने आमच्या घरात प्रवेश केला. विवाहानंतर काही दिवस आम्ही आगाशी येथेच राहत होतो. त्यानंतर आम्ही एप्रिल १९७५मध्ये दहिसर येथे राहायला आलो. लग्नाच्या वेळी तिचं वय अवघे १९ वर्षं एवढं होतं. त्यामुळे तिला संसाराच्या कामातील काही माहिती नव्हती.
शेतीच्या कामानिमित्त आई-वडील शेतावर असत. पण त्यावेळी आमच्या आजीने तिला घरातील सर्व कामं शिकवली आणि त्याप्रमाणे ती त्या कामात पारंगत झाली. त्याबद्दल आजे सासू आणि सासू-सासरे यांनी कौतुक केलं. आमची आई शेतीच्या कामासाठी शेतावर असल्याने तिने तिच्या जागी उभं राहून आम्हा तिन्ही भावंडांचे जेवणाचे डबे वेळेवर पाठवण्यापासून सर्व काही व्यवस्थित केलं. तसंच माझी सरकारी नोकरी असल्याने माझा पगार बेताचाच होता. त्यामुळे संसाराला हातभार लावण्याच्या दृष्टीने लहान मुलं सांभाळणं, त्यांना शाळेत पाठवणं तसंच परत आल्यानंतर त्यांचं खाणं-पिणं करणं यासर्व गोष्टी तिने कोणतीही तक्रार न करता केल्या. तसंच शाळेतील शिक्षकांना डबे पाठवण्याचंही काम केलं. अशा पद्धतीने तिने संसाराला हातभार लावला. तिने हौस-मौजेचा कधीही आग्रह धरला नाही. नंतर मुलांनीही संसाराला हातभार लावला.
माझ्या दोन्ही भावांची लग्नकार्य होईपर्यंत तिने आईच्या जागी उभं राहून कोणतीही तक्रार न करता सर्व काही व्यवस्थित केलं. त्याप्रमाणे ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही त्यांनी तिला योग्य तो मान दिला, तिचा आदर केला. तसंच तिच्या दोन्ही जाऊ बाईंनीदेखील तिचा मान राखला. तसंच तिचे शेजारी-पाजारीदेखील संबंध चांगले होते.
मला दोन मुलं, दोन सुना आणि दोन नातू असून दोन्ही मुलं नोकरी-व्यवसाय करत असून त्यांचे संसार स्थिरावले आहेत. माझा संसार केवळ तिने दिलेल्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे होऊ शकला. अशातच १२ मे, २००७ रोजी तिचं दुःखद निधन झालं. प्रत्येक क्षणाला, सणावाराला, कोणत्याही घरगुती कार्यक्रमाच्या वेळी सर्वांना तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही.