अ‍ॅपशहर

​ ती नसती तर...

चि. सौ. का. शकुंतला गोलतकरची ७ जून, १९६६ रोजी स्वाती विजय आचरेकर झाली. या वर्षी आमच्या लग्नाला ५१ वर्षं पूर्ण झाली. ती २१ वर्षांची असताना आम्हाला मुलगा झाला. त्याचं संगोपन इतकं छान केलं की सुदृढ बालक स्पर्धेचं त्याला प्रथम बक्षीस मिळालं. स्वाती एक चांगली गृहीणी आहे. आम्हाला घरातील कामांमुळे, जबाबदाऱ्यांमुळे तरूणपणी कुठे जाता आलं नाही.

Maharashtra Times 22 Jun 2017, 12:37 am
विजय आचरेकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my better half
​ ती नसती तर...


चि. सौ. का. शकुंतला गोलतकरची ७ जून, १९६६ रोजी स्वाती विजय आचरेकर झाली. या वर्षी आमच्या लग्नाला ५१ वर्षं पूर्ण झाली. ती २१ वर्षांची असताना आम्हाला मुलगा झाला. त्याचं संगोपन इतकं छान केलं की सुदृढ बालक स्पर्धेचं त्याला प्रथम बक्षीस मिळालं. स्वाती एक चांगली गृहीणी आहे. आम्हाला घरातील कामांमुळे, जबाबदाऱ्यांमुळे तरूणपणी कुठे जाता आलं नाही. माझा भाऊ त्याच्या उमेदीच्या काळातच कालवश झाला. त्याच्या मागे पत्नी व तीन मुली आहेत. स्वातीने दिलेल्या धीरामुळे आम्ही या संकटातून बाहेर पडलो. तीन मुलींची लग्नं झाली व वहिनी देवाघरी गेली. तेव्हा तिचं वय फक्त पन्नास वर्षं इतकंच होतं. मला ६९ वर्षी कॅन्सरचं निदान झालं. त्या काळात माझ्या मुलाने आणि पाच मुलींनी (तीन भावाच्या आणि एक सून) माझी चांगली देखभाल केली. स्वातीने हॉस्पिटलमधून घरी आल्यावर लहान मुलासारखे मला जपलं व मला माझ्या पायावर पुन्हा एकदा उभं केलं. जणू माझा पुर्नजन्म झाला. मुलांच्या कृपेने आणि स्वातीच्या धीरामुळे आम्ही थोडे पर्यटन केलं. या सगळ्यामध्ये ती कधी मला सोडून दूर गेल्याचं आठवत नाही. ती माझ्या नजरेसमोरुन काही तास तरी लांब गेली तरी माझा जीव कासावीस होतो. अशा माझ्या अर्धांगीनीला म्हणजेच स्वातीला देव उदंड आयुष्य देवो!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज