म. न. ढोकळे, डोंबिवली
मी ग्रामीण भागातून आहे आणि एम. कॉम आहे तर माझी पत्नी पुण्याची पूर्वाश्रमीची रोहिणी बडवे. पुण्याच्या बंगला संस्कृतीत राहूनही रोहिणीने माझ्यासारख्या ग्रामीण भागातील व्यक्तीशी विवाह केल्यानंतर कोल्हापुरात एका खोलीच्या घरातून संसाराला सुरवात केली. डोंबिवलीत चाळीतील दोन खोल्यांच्या जागेत आमचा प्रपंच १९७७ ते ८२ पर्यंत होता. मुलगा निखिल आणि मुलगी सोनल यांचं प्राथमिक शिक्षण सुरु होतं.
रोहिणीने नोकरी केली नाही. पण १९७५पासून कोल्हापुरात एलआयसी एजन्सी आणि डोंबिवलीत महिला बचत योजना अंतर्गत पोस्टांची आर.डी मुदत ठेव, नॅशनल सेव्हिंग या माध्यमातून काम केलं. त्याचकाळात मावस भावाला बँकेत डबा पुरवताना त्याच्या आठ दहा मित्रांना डबे पुरवले. असा सर्व आटापिटा तिने हिमतीने संभाळला. मुलांची शिक्षणं, आजारपण आणि सर्व व्यवसाय संभाळून.
साधारण १९८२मध्ये आम्ही सध्या राहतो त्या मधुबनमध्ये राहण्यास आलो. रोहिणी घरी नसण्याची झळ माझ्यापेक्षा माझ्या मुलांना जास्त लागली. त्यांना एकट्याने घरी थांबावं लागे. पण सर्वांनी ते निभावून नेलं. रोहिणीने ते सर्व संभाळलं. आता सर्व आनंदी आहे. मुलगा निखिल अमेरिकेला असतो रोहिणी त्याच्याकडे दोन तीन वेळा जाऊन आली. त्यादरम्यान मला एकटं राहण्याची सवय झाली आहे. पण माझ्या त्या अर्धांगिनीसाठी खालील चार ओळी-
नसतेस घरी तू जेव्हा
जीव माझा कासावीसतो
एकटेपणा मग छळतो
समजूत मनाची करतो
आठवणीतच विरघळतो
नसतेस घरी तू जेव्हा...
मी ग्रामीण भागातून आहे आणि एम. कॉम आहे तर माझी पत्नी पुण्याची पूर्वाश्रमीची रोहिणी बडवे. पुण्याच्या बंगला संस्कृतीत राहूनही रोहिणीने माझ्यासारख्या ग्रामीण भागातील व्यक्तीशी विवाह केल्यानंतर कोल्हापुरात एका खोलीच्या घरातून संसाराला सुरवात केली. डोंबिवलीत चाळीतील दोन खोल्यांच्या जागेत आमचा प्रपंच १९७७ ते ८२ पर्यंत होता. मुलगा निखिल आणि मुलगी सोनल यांचं प्राथमिक शिक्षण सुरु होतं.
रोहिणीने नोकरी केली नाही. पण १९७५पासून कोल्हापुरात एलआयसी एजन्सी आणि डोंबिवलीत महिला बचत योजना अंतर्गत पोस्टांची आर.डी मुदत ठेव, नॅशनल सेव्हिंग या माध्यमातून काम केलं. त्याचकाळात मावस भावाला बँकेत डबा पुरवताना त्याच्या आठ दहा मित्रांना डबे पुरवले. असा सर्व आटापिटा तिने हिमतीने संभाळला. मुलांची शिक्षणं, आजारपण आणि सर्व व्यवसाय संभाळून.
साधारण १९८२मध्ये आम्ही सध्या राहतो त्या मधुबनमध्ये राहण्यास आलो. रोहिणी घरी नसण्याची झळ माझ्यापेक्षा माझ्या मुलांना जास्त लागली. त्यांना एकट्याने घरी थांबावं लागे. पण सर्वांनी ते निभावून नेलं. रोहिणीने ते सर्व संभाळलं. आता सर्व आनंदी आहे. मुलगा निखिल अमेरिकेला असतो रोहिणी त्याच्याकडे दोन तीन वेळा जाऊन आली. त्यादरम्यान मला एकटं राहण्याची सवय झाली आहे. पण माझ्या त्या अर्धांगिनीसाठी खालील चार ओळी-
नसतेस घरी तू जेव्हा
जीव माझा कासावीसतो
एकटेपणा मग छळतो
समजूत मनाची करतो
आठवणीतच विरघळतो
नसतेस घरी तू जेव्हा...