निलेश सामंत गौरी आणि माझे लग्न होऊन आता दहा वर्षाहूनही अधिक काळ झाला आहे. तरीही आज आम्ही एकमेकांवर तितकंच प्रेम करतो जेवढं लग्नाआधी करायचो. आमच्या प्रेमाचा वटवृक्ष बहरायला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागला आणि लगेचच आम्ही आमच्या घरच्यांच्या संमतीने लग्नही केलं. पण आजही तिचं लांब असणं मनाला तेवढच हुरहूर लावतं जेवढं लग्नाआधी किंवा लग्नानंतरच्या काही दिवसात लावायचं. वर्षापूर्वीची गोष्ट असेल तिला ऑफिसच्या कामानिमित्त गोव्याला जावं लागलं. या आधी सहजा असा तिने एकट्यानेच कामानिमित्त बाहेर जाण्याचा योग कधी आला नव्हता. त्यामुळे तिला आणि मलाही याची सवय नव्हती. तरी देखील वरवर मी तिला धीर आणि प्रोत्साहन देत होतो. पण आत कुठे तरी तिची खूप काळजी वाटत होती. जेव्हा तिला लोकलमध्ये बसवून फलाटा वरून निघालो तेव्हा पाय अगदी जड होऊ लागले. नंतरचे दोन दिवस तिच्याशिवाय कसे तरी ढकलले. त्यावेळी खूप वाटलं की, त्या माणसाच्या आठवणींपेक्षा तो माणूस बरोबर असणं खूप काही देऊन जातो. मला हे आमच्यातले बंध आयुष्यभर असेच घट्ट बांधलेलेच हवेत. गौरी या दोन ओळी फक्त तुझ्याकरता... असेन मी वा नसेन मी, पण जेवढे काही आहे आता जगायचे, ते फक्त तुझ्यापूरतेच जगेन मी
तुझ्यापुरतंच जगेन मी
जेव्हा तिला लोकलमध्ये बसवून फलाटा वरून निघालो तेव्हा पाय अगदी जड होऊ लागले. नंतरचे दोन दिवस तिच्याशिवाय कसे तरी ढकलले. त्यावेळी खूप वाटलं की, त्या माणसाच्या आठवणींपेक्षा तो माणूस बरोबर असणं खूप काही देऊन जातो. मला हे आमच्यातले बंध आयुष्यभर असेच घट्ट बांधलेलेच हवेत.
Maharashtra Times 23 May 2016, 12:12 am