प्रकाश शेट, माहीम
आपल्या लग्नाला ३६वर्षं होऊन गेली. लग्नापूर्वी कोकणातल्या भल्या मोठ्या घरात वाढलेली तू लग्नानंतर मुंबईतल्या लहानश्या जागेत राहायला आलीस. पण कोणतीही तक्रार न करता आनंदाने राहिलीस. लवकरच शेजारी राहाणारे माल्डीकार, दिघे आणि पवार कुटुंबात मिसळून गेलीस. आपलं घर दादर-माहीम या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे गावाकडची कोणी आजारी व्यक्ती मुंबईत हॉस्पिटलमध्ये असेल तर किंवा लग्न, बारसं यासारख्या शुभ प्रसंगासाठी काही खरेदी करायची असेल तर गावाकडच्या नातेवाईंकांचा डेरा आपल्या त्या छोट्याशा जागेत असायचा. पण तू मात्र सगळ्यांची उठ-बस अगदी हसतमुखाने करायचीस. त्यामुळेच की काय माझ्या मोठ्या भावाने तुझ नाव 'मनमुराद हास्य' असं ठेवलं होतं. पण आपलं दुर्देव म्हणजे त्याचाच अगदी तरुण वयात अल्पशा आजाराने मृत्यु झाला. त्यावेळी वहिनींना तूच धीर दिलास. सुट्टीत तू आणि मुलं गावाला गेलात की, पुढच्या बाजूच्या गॅलरीत आम्हा पुरुषांच्या उभ्या-उभ्या गप्पा रंगायच्या!
आता जरी या उतारवयात ८०० चौरस फूट जागेत रहायला आलो असलो तरी इथे चाळीतली मजा येत नाही. त्यात मुलगी लग्न होऊन गेली बंगलोरला आणि मुलगा परदेशात, त्यामुळे आलेला एकटेपणा तुझ्यापेक्षा जास्त मलाच जाणवतो. तेव्हा माझी समजूत घालत तूच मला सांगतेस की, 'तुझ्या शिवाजी पार्क कट्ट्या वरील मैत्रिणींची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली आहेत. पण ते पती-पत्नी मुंबईत एकटेच पण आनंदात राहातात. मग तुम्ही एवढे दु:खी का होता?' चाळीत राहात असताना तू बाहेरगावी गेलीस तरी तो एकटेपणा मला तेवढा जाणवत नसे. पण आता या मोठ्या जागेत राहायला आल्यापासून मला एकटेपणा सहन होणार नाही हे लक्षात घेऊन एकतर आपण दोघं सोबत गावी जातो. जर माझ्या ऑफिसच्या कामामुळे ते शक्य होत नसेल तर माझ्या मोठ्या भावाच्या मुलाकडे माझी राहाण्याची व्यवस्था करूनच तू गावी जातेस.
आपल्या लग्नाला ३६वर्षं होऊन गेली. लग्नापूर्वी कोकणातल्या भल्या मोठ्या घरात वाढलेली तू लग्नानंतर मुंबईतल्या लहानश्या जागेत राहायला आलीस. पण कोणतीही तक्रार न करता आनंदाने राहिलीस. लवकरच शेजारी राहाणारे माल्डीकार, दिघे आणि पवार कुटुंबात मिसळून गेलीस. आपलं घर दादर-माहीम या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे गावाकडची कोणी आजारी व्यक्ती मुंबईत हॉस्पिटलमध्ये असेल तर किंवा लग्न, बारसं यासारख्या शुभ प्रसंगासाठी काही खरेदी करायची असेल तर गावाकडच्या नातेवाईंकांचा डेरा आपल्या त्या छोट्याशा जागेत असायचा. पण तू मात्र सगळ्यांची उठ-बस अगदी हसतमुखाने करायचीस. त्यामुळेच की काय माझ्या मोठ्या भावाने तुझ नाव 'मनमुराद हास्य' असं ठेवलं होतं. पण आपलं दुर्देव म्हणजे त्याचाच अगदी तरुण वयात अल्पशा आजाराने मृत्यु झाला. त्यावेळी वहिनींना तूच धीर दिलास. सुट्टीत तू आणि मुलं गावाला गेलात की, पुढच्या बाजूच्या गॅलरीत आम्हा पुरुषांच्या उभ्या-उभ्या गप्पा रंगायच्या!
आता जरी या उतारवयात ८०० चौरस फूट जागेत रहायला आलो असलो तरी इथे चाळीतली मजा येत नाही. त्यात मुलगी लग्न होऊन गेली बंगलोरला आणि मुलगा परदेशात, त्यामुळे आलेला एकटेपणा तुझ्यापेक्षा जास्त मलाच जाणवतो. तेव्हा माझी समजूत घालत तूच मला सांगतेस की, 'तुझ्या शिवाजी पार्क कट्ट्या वरील मैत्रिणींची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली आहेत. पण ते पती-पत्नी मुंबईत एकटेच पण आनंदात राहातात. मग तुम्ही एवढे दु:खी का होता?' चाळीत राहात असताना तू बाहेरगावी गेलीस तरी तो एकटेपणा मला तेवढा जाणवत नसे. पण आता या मोठ्या जागेत राहायला आल्यापासून मला एकटेपणा सहन होणार नाही हे लक्षात घेऊन एकतर आपण दोघं सोबत गावी जातो. जर माझ्या ऑफिसच्या कामामुळे ते शक्य होत नसेल तर माझ्या मोठ्या भावाच्या मुलाकडे माझी राहाण्याची व्यवस्था करूनच तू गावी जातेस.