मुरारी लाड, कल्याण
मनुष्याचा जन्म मिळणं ही एक ईश्वराचं अलोलकीचं देणं आहे. त्यात आयुष्यात चांगला जोडीदार मिळणं ही एक जमेची बाजू. आमची रेशीम गाठ १९८३मध्ये बांधली गेली. गेली ३३ वर्षं सुख-दुःखाचे हिंदोळे झेलत आमचा हा संसाराचा लघुपट चालू आहे. आमच्या व्यवहाराचा सारा भार तिच्यावरच असतो. कारण बऱ्याच बायकांसारखे तिचंही मत असतं की, 'तुम्हाला काही कळत नाही'. व्यवहारात आणि स्वभावात दोन्हीकडे कडक मात्र आत दडलेलं प्रेम असतं. घरगुती वादविवाद होतात. पण ते सर्व क्षणभंगुर असतात. ती जेव्हा माहेरी जाते किंवा काही कारणास्तव गावी जाते तेव्हा मात्र एकटेपणा खूप जाणवतो. भाजीपासून आमटीपर्यंत जेवण कसं बनवायचं या दिलेल्या सूचना कशा पाळल्या जात नाहीत हे तिला माहित असूनही पुनारावृत्ती होतेच. मग फोनवर भाजीत मीठ आणि मसाल्याचं प्रमाण किती याची चर्चा. चार दिवस एवढी धावपळ उडते की पत्नीशिवाय जीवन अपूर्ण आहे असं वाटतं. तिच्या प्रत्यक क्षेत्रातली सूचना असते. विशेषतः वैद्यकीय सूचना जास्त असतात. आम्हाला सर्व कुटुंबाला त्या सूचना पाळाव्या लागतात. माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णयात तिचाच सल्ला योग्य ठरलाय. प्रत्येक निर्णयात तिचा सहभाग असतो. त्याची एवढी सवय झालीय की ती जेव्हा दूर जाते तेव्हा माझा कुठलाच निर्णय होत नाही. अगदी जेवण बनवण्याचासुद्धा.
मनुष्याचा जन्म मिळणं ही एक ईश्वराचं अलोलकीचं देणं आहे. त्यात आयुष्यात चांगला जोडीदार मिळणं ही एक जमेची बाजू. आमची रेशीम गाठ १९८३मध्ये बांधली गेली. गेली ३३ वर्षं सुख-दुःखाचे हिंदोळे झेलत आमचा हा संसाराचा लघुपट चालू आहे. आमच्या व्यवहाराचा सारा भार तिच्यावरच असतो. कारण बऱ्याच बायकांसारखे तिचंही मत असतं की, 'तुम्हाला काही कळत नाही'. व्यवहारात आणि स्वभावात दोन्हीकडे कडक मात्र आत दडलेलं प्रेम असतं. घरगुती वादविवाद होतात. पण ते सर्व क्षणभंगुर असतात. ती जेव्हा माहेरी जाते किंवा काही कारणास्तव गावी जाते तेव्हा मात्र एकटेपणा खूप जाणवतो. भाजीपासून आमटीपर्यंत जेवण कसं बनवायचं या दिलेल्या सूचना कशा पाळल्या जात नाहीत हे तिला माहित असूनही पुनारावृत्ती होतेच. मग फोनवर भाजीत मीठ आणि मसाल्याचं प्रमाण किती याची चर्चा. चार दिवस एवढी धावपळ उडते की पत्नीशिवाय जीवन अपूर्ण आहे असं वाटतं. तिच्या प्रत्यक क्षेत्रातली सूचना असते. विशेषतः वैद्यकीय सूचना जास्त असतात. आम्हाला सर्व कुटुंबाला त्या सूचना पाळाव्या लागतात. माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णयात तिचाच सल्ला योग्य ठरलाय. प्रत्येक निर्णयात तिचा सहभाग असतो. त्याची एवढी सवय झालीय की ती जेव्हा दूर जाते तेव्हा माझा कुठलाच निर्णय होत नाही. अगदी जेवण बनवण्याचासुद्धा.