अ‍ॅपशहर

आनंदाला किनार स्वप्नपूर्तीची

बऱ्याच प्रतिक्षेनंतर ११ नोव्हेंबर १९९६ रोजी मी बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून रुजू झालो. तो लक्ष्मी पूजन नंतरचा दुसरा दिवस (दिवाळी पाडवा) होता. वडाळा डेपोमध्ये सकाळी आठ वाजता हजर झालो. मला एक नंबरच्या डबल डेकर गाडीवर काम करण्यासाठी पाठवण्यात आलं. सहकारी जेष्ठ कंडक्टर सांभाळून घेत होते. पहिला दिवस चांगला गेला. नोव्हेंबरचा महिनाही उत्तम गेला.

Maharashtra Times 20 Jun 2016, 12:56 am
>> शरद साडविलकर, कांदिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम first salary
आनंदाला किनार स्वप्नपूर्तीची


बऱ्याच प्रतिक्षेनंतर ११ नोव्हेंबर १९९६ रोजी मी बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून रुजू झालो. तो लक्ष्मी पूजन नंतरचा दुसरा दिवस (दिवाळी पाडवा) होता. वडाळा डेपोमध्ये सकाळी आठ वाजता हजर झालो. मला एक नंबरच्या डबल डेकर गाडीवर काम करण्यासाठी पाठवण्यात आलं. सहकारी जेष्ठ कंडक्टर सांभाळून घेत होते. पहिला दिवस चांगला गेला. नोव्हेंबरचा महिनाही उत्तम गेला.

अखेर पगाराचा दिवस उजाडला आला. त्यावेळी पगार बँकेत जमा होण्याची सुविधा नव्हती. डेपोमध्येच पगाराचे पाक‌टि मिळत असे. पगाराचा दिवस म्हणजे डेपोमध्ये आणि डेपोच्या बाहेरही उत्साही वातावरण असे. वेगवेगळे विक्रेते आगाराच्या बाहेर ठाण मारून बसलेले असत. मी पगार घेतला. आगाराच्या बाहेर कंदी पेढे खरेदी केले आणि शिवडीच्या घरी आलो. पगाराचे पाक‌टि वडिलांच्या हातात सुपूर्द केले. वडिलांनी ते पाकिट उघडलं आणि परत माझ्या हातात दिलं. ती सर्व रक्कम बँकेत जमा करण्यास सांगितली. त्यांच्या आनंदाला स्वप्नपूर्तीचीही किनार होती. त्यांच्या तरुणपणी त्यांनी बेस्टमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले होते. पण नोकरीची संधी थोडक्यात हुकली होती.

वडिलांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पगार बँकेमध्ये जमा केला. पहिल्या पगाराने एका अर्थी माझ्या बचतीचा श्रीगणेशा झाला. नोकरी लागण्यापूर्वी मी आमच्या दुकानात काम करत असे. नोकरी नंतरही मी वडीलांना दुकानामध्ये मदत करत असे. त्यामुळे तिथे असेपर्यंत पुढील तीन वर्ष माझ्या पगाराची बचत झाली होती. त्यातूनच मला माझ्या स्वप्नातील घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी व्यवस्थित न‌यिोजन करता आलं. कुणाला वेळप्रसंगी छोटी मोठी आर्थिक मदतही करता आली. आज माझ्या मुलांची शिक्षणं प्रगतीपथावर आहेत. हृदयविकारासारख्या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलो. पाठी वळून पाहताना असं वाटतं की, बेस्टच्या धावत्या चाकाने माझ्या आयुष्याला प्रगतीची दिशा दिली. वीस वर्षांत अनेक पगार झाले. पण वडिलांच्या हातात द‌लिेला तो पह‌लिा पगार आण‌ि त्यानंतर त्यांच्या चेह‍‍‍ऱ्यावर द‌सिलेलं ते समाधान हे कधीच व‌सिता येणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज