चंद्रशेखर परांजपे, दहिसर मी तशा छोट्या-मोठ्या नोकऱ्या बऱ्याच केल्या. पण खऱ्या अर्थानं नोकरी लागली ती बँकेत १९७४ साली. खिशात एकही दमडी नव्हती. कराडला रुजू झालो तेव्हा आत्या अण्णांकडून उसनवार १०० रुपये घेतले. शिवाय खोलीचं भाडं, मेसचं, हॉटेलचं सगळंच उधारीवर होतं. त्यात स्वाभिमान अगदी ओतू जाणारा. पगार झाल्याशिवाय गरजेशिवाय काही खर्च करायचा नाही हे पक्कं मनात होतं. त्या परिस्थितीत पगाराच्या दिवसाकडे डोळे लावून बसलो नसतो तर नवल. अखेर तो पगाराचा दिवस उजाडला. महिना संपण्याच्या १ दिवस आधी पगार व्हायचा. सगळ्या गोष्टी उधारीवर त्यामुळे अण्णांचे १०० रुपयेही द्यायचे होते. माझा पगार १६ दिवसांचा होता. पगार करणाऱ्या किशोरने रक्कम ही सांगितली. पण खात्यात जमा होईल असंही तो म्हणाला. मी एवढा बावळट की माझं खातं बेळगावला आहे असं सगळ्यांसमोर म्हणालो. सगळे सिनिअर माझ्यावर हसले. थोड्याच दिवसांनी पगार खात्यात जमा झाला. सर्व प्रथम अण्णांचे १०० रुपये मनी ऑर्डरने पाठवले आणि घरी बेळगावला ही १०० रुपये पाठवले. त्यानंतर उर्वरीत पैशात खोलीचं भाडं १० रुपये, हॉटेलचे १५ रुपये आणि मेसचे ३५ देऊन माझ्यावरचे कर्ज फेडले.
उधारीचे पैसे देऊ केले
पण खात्यात जमा होईल असंही तो म्हणाला. मी एवढा बावळट की माझं खातं बेळगावला आहे असं सगळ्यांसमोर म्हणालो. सगळे सिनिअर माझ्यावर हसले. थोड्याच दिवसांनी पगार खात्यात जमा झाला. सर्व प्रथम अण्णांचे १०० रुपये मनी ऑर्डरने पाठवले आणि घरी बेळगावला ही १०० रुपये पाठवले. त्यानंतर उर्वरीत पैशात खोलीचं भाडं १० रुपये, हॉटेलचे १५ रुपये आणि मेसचे ३५ देऊन माझ्यावरचे कर्ज फेडले.
Maharashtra Times 28 Apr 2016, 12:12 am