अ‍ॅपशहर

काव्यमैफलीत माझ्या...

ज्यात आपलं मन रमतं त्यालाच आपण छंद म्हणतो. माझा छंद आहे लेखन करणं मी काही मोठी लेखिका नाही. पण आपल्या अवतीभवती जे घडतं त्याबद्दल, आपल्या अनुभवावरून मी काही न् काही लिहित असते. त्यातही मला कविता लिहायला जास्त आवडतात. वसंत बापट, नां.धो. महानोर, कवी अनिल यांच्या खूप कविता वाचल्यानंतर मलाही लिहावंसं वाटू लागलं.

Maharashtra Times 14 Mar 2017, 12:29 am
वैशाली जोशी, खारघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम like to write poem
काव्यमैफलीत माझ्या...


ज्यात आपलं मन रमतं त्यालाच आपण छंद म्हणतो. माझा छंद आहे लेखन करणं मी काही मोठी लेखिका नाही. पण आपल्या अवतीभवती जे घडतं त्याबद्दल, आपल्या अनुभवावरून मी काही न् काही लिहित असते. त्यातही मला कविता लिहायला जास्त आवडतात. वसंत बापट, नां.धो. महानोर, कवी अनिल यांच्या खूप कविता वाचल्यानंतर मलाही लिहावंसं वाटू लागलं. विविध विषयावर लिहायला आवडतं. शिवाय मैत्रिणी-नातेवाईक यांच्या प्रोत्साहनाने मी जास्तच लिहू लागले. मुलं मोठी झाली, आपापल्या संसाराला लागली आणि मला खूप वेळ मिळू लागला. फेसबूक, वर्तमानपत्र यातून प्रसिद्ध झालेले आपले स्वतःचे लेखन पहिल्यावर खूप आनंद होतो. 'दिसामाजी काहीतरी लिहित जावे', असे समर्थ रामदासांनी सांगितलं आहेच. सर्वजण माझ्या लिखाणाची दखल घेतात, कौतुक करतात. खूप वाचनामुळे आपले शब्द भांडारही वाढते म्हणून वाचनही करते. सोबत माझी एक कविता देत आहे, बघा तुम्हाला आवडते का?
पैंजण रूणझुणले राधेचे
कंकण किणकिणले राधेचे
प्रेमधून ती ऐकू येता
कुंडल ते डुलले राधेचे
बावरली हरखली अशी की
मन सैरभैर झाले राधेचे
धावत सुटली जाण न उरली
कृष्णओठीची मुरली झाली
जग सुरात भिजले राधेचे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज