अ‍ॅपशहर

आई, तुझी आठवण येते

माझे वडील २९ सप्टेंबर १९६९ साली आम्हाला सोडून देवाघरी गेले. त्यावेळी आम्ही सर्व भावंड शिकत होतो. घरात कमावणारं कोणीच नव्हतं. कोणाचा आधार नव्हता. पण आशा परिस्थितीतही आईने आम्हाला वाढवलं. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती आमच्यासाठी कष्ट करत राहिली.

Maharashtra Times 29 Mar 2016, 12:52 am
>> विनायक चोणकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम assa vadhavla mulanna
आई, तुझी आठवण येते


माझे वडील २९ सप्टेंबर १९६९ साली आम्हाला सोडून देवाघरी गेले. त्यावेळी आम्ही सर्व भावंड शिकत होतो. घरात कमावणारं कोणीच नव्हतं. कोणाचा आधार नव्हता. पण आशा परिस्थितीतही आईने आम्हाला वाढवलं. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती आमच्यासाठी कष्ट करत राहिली. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माझ्या आईने आम्हाला शिकायला प्रोत्साहन दिलं. घरचा प्रपंच सांभाळताना आम्हाला आर्थिक परिस्थितीची झळ लागू दिली नाही. कंपनीच काम घरी आणून आणि शिलाई कामाच्या पैशातून घर चालवत असे. आईनेच आम्हा भावंडाना शिक्षणासोबत कष्ट करण्याचं बाळकडू पाजलं. त्यामुळे आम्ही भावंड चांगल्या ठिकाणी नोकरीला लागलो. प्रत्येकाला स्वत:च्या पायावर उभं राहाण्याचं बळ दिलं आणि जगात ताठ मानेन जगायला शिकवलं. पुढे सर्व भावंडांची लग्न करुन दिली. हे करत आसताना ती स्वतः चंदनासारखी झिजत राहिली. पण आमच्या भावंडांचा सुखी संसार बघण्यासाठी मात्र ती आमच्यात राहिली नाही. ती देवाघरी जाऊन पाच वर्षं झाली. पण तिची आठवण आल्याशिवाय आमचा एकही दिवस जात नाही. आई आम्ही तुला कधीही विसरु शकणार नाही. याच माऊला पोटी पुन्हा जन्म मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज