अ‍ॅपशहर

काळी माती, हिरवं शिवार

गेलं वर्षभर नोकरी निमित्ताने गावापासून दूर रहावं लागलं. आपल्या ओळखीचं आजूबाजूला कोणीच नाही हा विचार फार त्रासदायक असतो. घरी असल्यावर आपल्या परिवारातील कोणीतरी आपल्या डोळासमोर असतं, हे फार मानसिक सुख देणारं असतं. कुटुंब, मित्र, सगेसोयरे सगळ्यांच्या आठवणी मनात घर करून असतात. आपल्या आप्तेष्टांबरोबर घालवलेले क्षण आठवतात. अशाप्रकारे एका मगोमाग गत जीवनातील आठवणी डोळ्यासमोरुन तरळतात. असं असलं तरी मला एकट्याने राहायला जास्त आवडतं. एकांतात काही क्षण घालावयला मला आवडतात.

Maharashtra Times 30 Oct 2017, 12:11 am
विजय पावबाके, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my farm is my life
काळी माती, हिरवं शिवार


गेलं वर्षभर नोकरी निमित्ताने गावापासून दूर रहावं लागलं. आपल्या ओळखीचं आजूबाजूला कोणीच नाही हा विचार फार त्रासदायक असतो. घरी असल्यावर आपल्या परिवारातील कोणीतरी आपल्या डोळासमोर असतं, हे फार मानसिक सुख देणारं असतं. कुटुंब, मित्र, सगेसोयरे सगळ्यांच्या आठवणी मनात घर करून असतात. आपल्या आप्तेष्टांबरोबर घालवलेले क्षण आठवतात. अशाप्रकारे एका मगोमाग गत जीवनातील आठवणी डोळ्यासमोरुन तरळतात. असं असलं तरी मला एकट्याने राहायला जास्त आवडतं. एकांतात काही क्षण घालावयला मला आवडतात.
माझा शिक्षकी पेशा असल्याने दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाता येतं. सर्वांच्या भेटी गाठी होतात. स्नेहभोजनाच्या पंगती होतात. विचारांची, अनुभवांची, किस्स्यांची देवाणघेवाण होते. सर्वांसोबत असल्यावर कसं छान वाटतं. मन प्रसन्न होतं. पण तरी एक अशी जागा आहे, जिथे वेळ घालवल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. ती जागा म्हणजे आमचं शेत व शेताच्या बांधावर असलेले कडूलिंबाचं झाड होय. शेतात काम करण्याची मला विलक्षण आवड आहे. सुट्टी लागली की आराम करण्यापेक्षा शेतात काम करता येईल या गोष्टीचा मला जास्त आनंद होतो. शेतात जे पिक असेल त्या पिकाला पाणी देणं, वाऱ्यावर डोलणारं पिक पाहणं, आकाशात भिरभिरणारी पाखर पाहणं या गोष्टी मनाला खुप सुखावून जातात.
भूक लागली की, कडुलिंबाच्या झाडाखाली भाकर-भाजी खाताना तेथील वातावरण एवढं आल्हाददायी वाटतं की, एखाद्याला फाइव्ह स्टार हॉटेल्सचा झगमगाटही कमी वाटावा. ऊन वाढलं की लिंबाच्या सावलीत गार-गार गवताच्या अंथरुणावर झोप कधी लागते ते कळतसुद्धा नाही. मधेच येणारा गार वारा अंगावर जणू पांघरुनच घालत असतो. ही जागा आणि येथे केलेला स्वसंवाद मला आत्मिक समाधान देऊन जातो. कामावर परतल्यावर हे सुवर्णक्षण अनुभवताच येत नाहीत. पण मनात जपलेल्या आमच्या हिरव्या शिवाराच्या आठवणी माझं मनही सदा हिरवंगार ठेवतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज