अक्षय कुंभार, बेलापूर
खरंच प्रत्येक माणसाला एक स्वतःची वेगळी स्पेस असतेच. दररोजच सकाळी उठायचं, घड्याळ्याच्या काट्यासारखं धावायला तयार व्हायचं, गर्दीने भरलेली लोकल पकडून धक्के खात नोकरीचं आयुष्य जगायचं ,परत संध्याकाळी घरी जेवून झोपायचं. परत दुसऱ्या सकाळी तेच. या सगळ्या धावपळीत कुटुंबासाठी वेळ मिळत नाही, मग स्वतःसाठी कधी वेळ काढायचा, असा आपल्यापैकी बहुतांश चाकरमान्यांना प्रश्न पडतोच. विचारांच्या जाळ्यात अडकलेल्या माणसाला शांतता हवी असते आणि ही शांतता मला निसर्गरम्य वातावरणातच मिळते. जिथं एकांत आहे, जिथं स्वच्छ वातावरण आहे, जिथं सळसळणारी हवा आहे, जिथं डोळ्यांना सुखावेल असं निसर्गसौंदर्य आहे.
रविवारी सुट्टी असली की, मी हळूच घरातून पळ काढून अशा निसर्गाला शोधत असतो. असंच एक ठिकाण म्हणजे खारघरमधला अभिमानाने उभा असलेला सुंदर डोंगर. ज्याला नाव नाही, प्रसिध्दी नाही. जिथं जास्ती कोणी जात नाही, अशा त्या डोंगरावर वाट शोधून जायची मज्जाच वेगळी आहे. खरंच निसर्ग किती देत असतो, पण त्या बदल्यात आपण त्याला काहीच देत नाही, याचीच खंत वाटते. त्या डोंगरावरुन पूर्ण खारघर या शहराचं नयनरम्य दृश्य दिसतं. गावातील कौलारु घरं, पाणी अडवून ठेवलेला बांध आणि फक्त पावसाळ्यातच असलेली हिरवळ मनाला आंनद देऊन जाते. तिथला सुंदर अनुभव मनाला परत-परत तिथं जाण्यासाठी खुणावतो. डोंगर चढल्यामुळे आलेला थकवा डोंगरावर पोहोचल्यावर जणू पळूनच जातो. आजच्या तरुण मंडळींना एकच सांगावसं वाटतं की, निसर्ग आपल्या आई-वडिलांप्रमाणेच आहे. त्याचा आदर करा आणि भरपूर प्रेम करा.
खरंच प्रत्येक माणसाला एक स्वतःची वेगळी स्पेस असतेच. दररोजच सकाळी उठायचं, घड्याळ्याच्या काट्यासारखं धावायला तयार व्हायचं, गर्दीने भरलेली लोकल पकडून धक्के खात नोकरीचं आयुष्य जगायचं ,परत संध्याकाळी घरी जेवून झोपायचं. परत दुसऱ्या सकाळी तेच. या सगळ्या धावपळीत कुटुंबासाठी वेळ मिळत नाही, मग स्वतःसाठी कधी वेळ काढायचा, असा आपल्यापैकी बहुतांश चाकरमान्यांना प्रश्न पडतोच. विचारांच्या जाळ्यात अडकलेल्या माणसाला शांतता हवी असते आणि ही शांतता मला निसर्गरम्य वातावरणातच मिळते. जिथं एकांत आहे, जिथं स्वच्छ वातावरण आहे, जिथं सळसळणारी हवा आहे, जिथं डोळ्यांना सुखावेल असं निसर्गसौंदर्य आहे.
रविवारी सुट्टी असली की, मी हळूच घरातून पळ काढून अशा निसर्गाला शोधत असतो. असंच एक ठिकाण म्हणजे खारघरमधला अभिमानाने उभा असलेला सुंदर डोंगर. ज्याला नाव नाही, प्रसिध्दी नाही. जिथं जास्ती कोणी जात नाही, अशा त्या डोंगरावर वाट शोधून जायची मज्जाच वेगळी आहे. खरंच निसर्ग किती देत असतो, पण त्या बदल्यात आपण त्याला काहीच देत नाही, याचीच खंत वाटते. त्या डोंगरावरुन पूर्ण खारघर या शहराचं नयनरम्य दृश्य दिसतं. गावातील कौलारु घरं, पाणी अडवून ठेवलेला बांध आणि फक्त पावसाळ्यातच असलेली हिरवळ मनाला आंनद देऊन जाते. तिथला सुंदर अनुभव मनाला परत-परत तिथं जाण्यासाठी खुणावतो. डोंगर चढल्यामुळे आलेला थकवा डोंगरावर पोहोचल्यावर जणू पळूनच जातो. आजच्या तरुण मंडळींना एकच सांगावसं वाटतं की, निसर्ग आपल्या आई-वडिलांप्रमाणेच आहे. त्याचा आदर करा आणि भरपूर प्रेम करा.