अ‍ॅपशहर

कर्माचे फळ

मित्रांनो, एक दया नावाची महिला असते. तिला एक मुलगा असतो. त्याचं नाव गोपाळ असतं. दया ही नांवाप्रमाणेच दयाळू असते. तिच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरी शोधण्याच्या निमित्ताने बाहेर गावी जातो. दया रोज तीन भाकरी आणि भाजी करत असे. दोन भाकरी स्वतःसाठी ठेवून एक भाकरी आणि थोडी भाजी आपल्या घराच्या उघड्या खिडकीत ठेवत असे.

Maharashtra Times 10 Apr 2017, 12:34 am
शरयू काळे, सानपाडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम karma gives back wharever you do
कर्माचे फळ


मित्रांनो, एक दया नावाची महिला असते. तिला एक मुलगा असतो. त्याचं नाव गोपाळ असतं. दया ही नांवाप्रमाणेच दयाळू असते. तिच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरी शोधण्याच्या निमित्ताने बाहेर गावी जातो. दया रोज तीन भाकरी आणि भाजी करत असे. दोन भाकरी स्वतःसाठी ठेवून एक भाकरी आणि थोडी भाजी आपल्या घराच्या उघड्या खिडकीत ठेवत असे. जेणेकरून एखादा गरीब भुकेला असेल तर ती भाकरी त्याला दिसेल आणि ती खाऊन तो संतुष्ट होईल. एक गरीब कुबडा माणूस ती भाकरी रोज पहात असे आणि तो ती खात असे. पण तो भाकरी घेत असताना, 'चांगले कराल तर चांगले होईल, वाईट कराल तर वाईट होईल', असं पुटपुटत असे.
दया त्या माणसाला रोज बघत असे. ती विचार करते की, हा माणूस रोज भाजी भाकरी घेऊन जातो, माझ्याकडे बघतो आणि काहीतरी पुटपुटत निघून जातो. पण मला धन्यवाद म्हणत नाही किंवा आशीर्वादही देत नाही. तिला त्या माणसाचा खूप राग येतो. एके दिवशी रागाच्या भरात ती एका भाकरीत विष कालवते आणि ती भाकरी खिडकीत ठेवायला जाते. पण दुसऱ्या क्षणी तिच्या मनात विचार येतो की, मी जे करते आहे ते अत्यंत वाईट आहे. हे बरोबर नाही असा विचार करून ती विषारी भाकरी चुलीत जाळून टाकते आणि दुसरी ताजी भाकरी करून खिडकीत ठेवते. नित्याप्रमाणे तो माणूस भाकरी खातो आणि पुटपुटून निघून जातो.
काही वेळाने दारावर टकटक होते. ती दार उघडते. दारात आपला मुलगा गोपाळ पाहून तिला फार आनंद होतो. दया त्याची विचारपूस करते तेव्हा गोपाळ सांगतो की, मी फार थकलेला आणि भुकेलेला आहे. बऱ्याच दिवसात मला खायला मिळालेलं नाही. अशक्तपणामुळे मी रस्त्यात चक्कर येऊन पडलो. एका माणसाने माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि मी शुद्धीवर आलो. त्याने मला भाकरी आणि भाजी खावयास दिली. तेव्हा कुठे मी कसाबसा घरापर्यंत येऊ शकलो.
आता दयाच्या लक्षात येतं की, आपल्या मुलाला मदत करणारा तो रोजचाच कुबडा माणूस आहे. तिच्या काळजात चर्र होतं. आज जर मी रागाच्या भरात केलेली विषारी भाकरी खिडकीत ठेवली असती तर किती अनर्थ झाला असता. ती देवाचे आभार मानते. तेव्हा मित्रांनो, नेहमी चांगलंच काम करत जा, तुमचं चांगलंच होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज