मुरारी लाड, कल्याण
एकदा जंगलाच्या काही प्राण्यांनी असं ठरवलं की, जंगलातल्या सर्व प्राण्यांचं स्नेहसंमेलन व्हावं. त्यासाठी त्यांनी पक्ष्यांनाही अमंत्रण द्यायचं ठरवलं. फक्त प्रश्न होता तो हा की वाघ आणि सिंहाला कसं पटवायचं. त्यासाठी प्राण्यातील हत्ती, कोल्हा, लांडगा, मगर आणि ससा एकत्र आले आणि पक्षातील मोर, कावळा, पोपट आणि कोकिळा इत्यादींना बरोबर घेऊन ते वाघ आणि सिंहाकडे गेले. वाघाची डरकळी ऐकूनच सगळे घाबरले. तिकडून सिंह राजही आले त्यांची गर्जना ऐकून तर ते पळू लागले. पण हत्ती महाराजांनी सर्वांना समजावलं. तुम्ही सहन करता म्हणून यांची दादागिरी आहे. थोडं आत्मविश्वास आणि धैर्य बाळगा. मग कोणीही तुम्हाला काहीही करणार नाही. मग सगळे एकत्र आले आणि प्रथम वाघोबाला भेटले. हत्तीने कोल्ह्याला बरोबर घेऊन वाघोबाशी चर्चा केली. तेवढ्यात सिंह राजही आले. मग चर्चेत त्यांनाही सामावून घेतलं. त्यांना संमेलनाचा उद्देश समजावला की आपण एकाच जंगलात राहतो तेव्हा सर्व हेवेदावे विसरून एकत्र येऊयात. परकीय लोक (मनुष्य प्राणी) जंगलतोड करत आहेत. आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेव्हा सर्वांनी एकत्र राहायला हवं. वाटल्यास वाघोबाने परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी सरसेनापती व्हावं. हे सर्वांनी मान्य केलं. मग त्यानुसार सगळे कामाला लागले. सर्व जंगल पिंजून काढून सर्वाना अमंत्रण दिलं आणि स्नेहसंमेलनाचा दिवस आला. एक भला मोठा पठार सजवण्यात आला. मोराने सुरेख रांगोळी काढली. सर्वजण वेगवेगळ्या वेशात नटून सजून आले. अवघा आनंदी आनंद होता. कोकिळेची गायन पार्टी असल्यावर आणखीन काय हवं. कोल्ह्याची कोलांटी उडी, माकडाच्या माकडचेष्टा, पोपटाचे सुरेख बोल आणि मोराचा शृंगारिक नाच, गरुडाची गरुडझेप. संमेलन एकदम रंगलं. प्रत्यकाने आपापली कला सादर केली आणि शेवटी स्नेहभोजन करून सर्वजण आनंदी मनाने घरी परतले. तर माझ्या लहान दोस्तांनो, सगळे हेवेदावे विसरुन, जुनं झालं-गेलं विसरुन सगळ्यांनी एकत्र येऊन, आनंदाने जगा.
एकदा जंगलाच्या काही प्राण्यांनी असं ठरवलं की, जंगलातल्या सर्व प्राण्यांचं स्नेहसंमेलन व्हावं. त्यासाठी त्यांनी पक्ष्यांनाही अमंत्रण द्यायचं ठरवलं. फक्त प्रश्न होता तो हा की वाघ आणि सिंहाला कसं पटवायचं. त्यासाठी प्राण्यातील हत्ती, कोल्हा, लांडगा, मगर आणि ससा एकत्र आले आणि पक्षातील मोर, कावळा, पोपट आणि कोकिळा इत्यादींना बरोबर घेऊन ते वाघ आणि सिंहाकडे गेले. वाघाची डरकळी ऐकूनच सगळे घाबरले. तिकडून सिंह राजही आले त्यांची गर्जना ऐकून तर ते पळू लागले. पण हत्ती महाराजांनी सर्वांना समजावलं. तुम्ही सहन करता म्हणून यांची दादागिरी आहे. थोडं आत्मविश्वास आणि धैर्य बाळगा. मग कोणीही तुम्हाला काहीही करणार नाही. मग सगळे एकत्र आले आणि प्रथम वाघोबाला भेटले. हत्तीने कोल्ह्याला बरोबर घेऊन वाघोबाशी चर्चा केली. तेवढ्यात सिंह राजही आले. मग चर्चेत त्यांनाही सामावून घेतलं. त्यांना संमेलनाचा उद्देश समजावला की आपण एकाच जंगलात राहतो तेव्हा सर्व हेवेदावे विसरून एकत्र येऊयात. परकीय लोक (मनुष्य प्राणी) जंगलतोड करत आहेत. आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेव्हा सर्वांनी एकत्र राहायला हवं. वाटल्यास वाघोबाने परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी सरसेनापती व्हावं. हे सर्वांनी मान्य केलं. मग त्यानुसार सगळे कामाला लागले. सर्व जंगल पिंजून काढून सर्वाना अमंत्रण दिलं आणि स्नेहसंमेलनाचा दिवस आला. एक भला मोठा पठार सजवण्यात आला. मोराने सुरेख रांगोळी काढली. सर्वजण वेगवेगळ्या वेशात नटून सजून आले. अवघा आनंदी आनंद होता. कोकिळेची गायन पार्टी असल्यावर आणखीन काय हवं. कोल्ह्याची कोलांटी उडी, माकडाच्या माकडचेष्टा, पोपटाचे सुरेख बोल आणि मोराचा शृंगारिक नाच, गरुडाची गरुडझेप. संमेलन एकदम रंगलं. प्रत्यकाने आपापली कला सादर केली आणि शेवटी स्नेहभोजन करून सर्वजण आनंदी मनाने घरी परतले. तर माझ्या लहान दोस्तांनो, सगळे हेवेदावे विसरुन, जुनं झालं-गेलं विसरुन सगळ्यांनी एकत्र येऊन, आनंदाने जगा.