श्रीधर देसाई, बोरिवली
पन्नास वर्षांपूर्वी कविराज शैलैंद्र अनंताच्या प्रवासास निघून गेले. यंदाचा १४ डिसेंबर हा त्यांचा पन्नासावा स्मृतिदिन होता. या निमित्ताने मला अतिशय आवडणाऱ्या त्यांच्या एका गीताबद्दल लिहावं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी इच्छा होती. म्हणून हा लेखनप्रपंच. १९५० आणि १९६०च्या दशकात असंख्य आणि अजरामर लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतं लिहीणाऱ्या या कवीचं एक गाणं मला अतिशय आवडतं. त्यांचीच निर्मिती असलेल्या आणि सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (१९६६) मिळवणाऱ्या 'तिसरी कसम' या चित्रपटातील हे गाणं आहे. मन्ना डे यांनी गायलेल्या या गाण्याला शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलं आहे. जगण्याच्या रोजच्या लढाईमध्ये विविध विषयांकडे धावणाऱ्या मनाचं प्रतिबिंब या गाण्यात मला दिसतं. मुनिया हा आकाराने लहान, बहुरंगी आणि चंचल पक्षी. या मुसाफिराला मोहात पाडणारी मुनिया पिंजऱ्यात बंद असली तरी पिंजरा सोडून सहज उडून जाते आणि पुन्हा पिंजऱ्यात परत येते ते पुन्हा उडून जाण्यासाठी. हा पिंजरा शरीराचा आणि ही मुनिया म्हणजे मन असं सांकेतिक वर्णन या गाण्यात करण्यात आलं आहे. या मनमोहक गाण्यातील ओळी अशा आहेत.
चलत मुसाफिर
मोह लिया रे,
पिंजडे वाली मुनिया....
उड उड बैठी हलवईया दोकनिया..
हे रामा...
बरफी के सब रस
ले लिया रे,
पिंजडे वाली मुनिया..
आ हे आ हे ... हे रामा
उड उड बैठी बजजवा दोकनिया..
आहा...
कपडा के सब रस
ले लिया रे,
पिंजडे वाली मुनिया...
जियो जियो पलकदास जियो!
उड उड बैठी पनवडिया दोकनिया..
हे रामा...
बीडा के सब रस
ले लिया रे,
पिंजडे वाली मुनिया...
कवीराज शैलैंद्र यांच्या या गीताचा अर्थ जाणवला तो असा की, प्राथमिक गरजा भागल्यानंतर जगण्यासाठी विविध रसांचा आस्वाद घेणंही महत्त्वाचं असतं. पण गरज आणि हव्यास यातील फरक समजून घेतला नाही तर या मन-मुनियाच्या इच्छापूर्तीचा व्यापार आणि प्रवासही अखंड आणि अनंत होतो.
पन्नास वर्षांपूर्वी कविराज शैलैंद्र अनंताच्या प्रवासास निघून गेले. यंदाचा १४ डिसेंबर हा त्यांचा पन्नासावा स्मृतिदिन होता. या निमित्ताने मला अतिशय आवडणाऱ्या त्यांच्या एका गीताबद्दल लिहावं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी इच्छा होती. म्हणून हा लेखनप्रपंच. १९५० आणि १९६०च्या दशकात असंख्य आणि अजरामर लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतं लिहीणाऱ्या या कवीचं एक गाणं मला अतिशय आवडतं. त्यांचीच निर्मिती असलेल्या आणि सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (१९६६) मिळवणाऱ्या 'तिसरी कसम' या चित्रपटातील हे गाणं आहे. मन्ना डे यांनी गायलेल्या या गाण्याला शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलं आहे. जगण्याच्या रोजच्या लढाईमध्ये विविध विषयांकडे धावणाऱ्या मनाचं प्रतिबिंब या गाण्यात मला दिसतं. मुनिया हा आकाराने लहान, बहुरंगी आणि चंचल पक्षी. या मुसाफिराला मोहात पाडणारी मुनिया पिंजऱ्यात बंद असली तरी पिंजरा सोडून सहज उडून जाते आणि पुन्हा पिंजऱ्यात परत येते ते पुन्हा उडून जाण्यासाठी. हा पिंजरा शरीराचा आणि ही मुनिया म्हणजे मन असं सांकेतिक वर्णन या गाण्यात करण्यात आलं आहे. या मनमोहक गाण्यातील ओळी अशा आहेत.
चलत मुसाफिर
मोह लिया रे,
पिंजडे वाली मुनिया....
उड उड बैठी हलवईया दोकनिया..
हे रामा...
बरफी के सब रस
ले लिया रे,
पिंजडे वाली मुनिया..
आ हे आ हे ... हे रामा
उड उड बैठी बजजवा दोकनिया..
आहा...
कपडा के सब रस
ले लिया रे,
पिंजडे वाली मुनिया...
जियो जियो पलकदास जियो!
उड उड बैठी पनवडिया दोकनिया..
हे रामा...
बीडा के सब रस
ले लिया रे,
पिंजडे वाली मुनिया...
कवीराज शैलैंद्र यांच्या या गीताचा अर्थ जाणवला तो असा की, प्राथमिक गरजा भागल्यानंतर जगण्यासाठी विविध रसांचा आस्वाद घेणंही महत्त्वाचं असतं. पण गरज आणि हव्यास यातील फरक समजून घेतला नाही तर या मन-मुनियाच्या इच्छापूर्तीचा व्यापार आणि प्रवासही अखंड आणि अनंत होतो.