देव आनंद-वैजयंतीमाला ही हिंदी सिनेमातील एक यशस्वी जोडी. त्यांच्या भूमिकांनी सजलेला १९५८ सालचा ‘अमर दीप’ हा सिनेमा मला आजही आवडतो तो त्यातील सी. रामचंद्र यांच्या मधूर आणि श्रवणीय गाण्यांमुळे! प्रख्यात गीतकार राजेन्द्र कृष्ण यांनी गाणी लिहिली होती आणि दिग्दर्शन दाक्षिणेचे टी. प्रकाश राव यांनी केलं होतं. ही एक तरल प्रेमकथा आहे. यातील ‘देख हमे आवाज ना देना’ हे महम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं युगुलगीत मला फार आवडतं. ते देव-वैजयंतिमाला यांच्यावर चित्रित झालं आहे. चालीत खूप गोडवा असून, त्यातला तबला, ग्रुप व्हायोलिन, पिआनो आणि अॅकॉर्डिअनचा वापर छान आहे.
अरुणा (वैजयंतीमाला) ही श्रीमंत तरुणी आपल्या आजोबांसमवेत (बिपिन गुप्ता) राहाते. तिचा विवाह प्राणशी (प्राण) व्हावा, अशी आजोबांची इच्छा; पण आपलं याच्याबरोबर पटणार नाही असं वाटून अरुणा घरातून पळ काढते. आजोबा प्राणला तिचा शोध घ्यायला सांगतात आणि तो तिला परत आणतो. आजोबांची प्रकृती बिघडून त्यात त्यांचं निधन होतं. प्राण अरुणाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती त्याला नकार देते. आपण घरातून निघून गेलो होतो तेव्हा अशोक (देव आनंद) नामक तरुणावर आपलं प्रेम बसलं असल्याचं ती त्याला सांगते. ते अशोकला शोधतात तेव्हा तो रूपा (पद्मिनी) या नर्तकीसमवेत असतो आणि अरुणाला ओळखत नाही. रूपाशी त्याचं लग्न होणार असतं. अरुणा-अशोकचं प्रेम हे निव्वळ स्वप्नरंजन होतं, की त्यानं तिला न ओळखण्यामागे काही वेगळं कारण होतं? सिनेमाच्या अखेरीस याची उकल होते.
देख हमे आवाज ना देना
ओ बेदर्द जमाने
आज चले हम छोड के तुझको
दुनिया नई बसाने
निर्दयी काळा, आता आम्हाला बोलावू नकोस, आज आम्ही तुला कायमचं सोडून दुसरं जग वसवण्यासाठी निघून चाललोय.
चमका शाम का पहला तारा
गगन दुलारा
सबसे पहले उसने देखा प्यार हमारा
आनेवाली रात सुनेगी तेरे मेरे तराने
दूर कहीं एक पंछी गाए
ये समझाए
प्यार में हो जाते हैं
अपने दर्द पराये
दिल की धडकन क्या होती है
प्यार करें तो जाने
नभाला प्रिय असणारा पहिला तारा चमकायला लागलाय आणि सर्वप्रथम त्यानंच आपली प्रीती पाहिली आहे. यानंतर येणारी रजनीही तुझी माझी प्रेमगीतं ऐकणार आहे. दूर कुठंतरी एक विहंग गातोय. प्रेमात आपली दु:खं परकी होतात हेच जणू तो सांगतोय. हृदयातली धडधड काय असते ते प्रेम केल्याविना समजणारच नाही.
अरुणा (वैजयंतीमाला) ही श्रीमंत तरुणी आपल्या आजोबांसमवेत (बिपिन गुप्ता) राहाते. तिचा विवाह प्राणशी (प्राण) व्हावा, अशी आजोबांची इच्छा; पण आपलं याच्याबरोबर पटणार नाही असं वाटून अरुणा घरातून पळ काढते. आजोबा प्राणला तिचा शोध घ्यायला सांगतात आणि तो तिला परत आणतो. आजोबांची प्रकृती बिघडून त्यात त्यांचं निधन होतं. प्राण अरुणाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती त्याला नकार देते. आपण घरातून निघून गेलो होतो तेव्हा अशोक (देव आनंद) नामक तरुणावर आपलं प्रेम बसलं असल्याचं ती त्याला सांगते. ते अशोकला शोधतात तेव्हा तो रूपा (पद्मिनी) या नर्तकीसमवेत असतो आणि अरुणाला ओळखत नाही. रूपाशी त्याचं लग्न होणार असतं. अरुणा-अशोकचं प्रेम हे निव्वळ स्वप्नरंजन होतं, की त्यानं तिला न ओळखण्यामागे काही वेगळं कारण होतं? सिनेमाच्या अखेरीस याची उकल होते.
देख हमे आवाज ना देना
ओ बेदर्द जमाने
आज चले हम छोड के तुझको
दुनिया नई बसाने
निर्दयी काळा, आता आम्हाला बोलावू नकोस, आज आम्ही तुला कायमचं सोडून दुसरं जग वसवण्यासाठी निघून चाललोय.
चमका शाम का पहला तारा
गगन दुलारा
सबसे पहले उसने देखा प्यार हमारा
आनेवाली रात सुनेगी तेरे मेरे तराने
दूर कहीं एक पंछी गाए
ये समझाए
प्यार में हो जाते हैं
अपने दर्द पराये
दिल की धडकन क्या होती है
प्यार करें तो जाने
नभाला प्रिय असणारा पहिला तारा चमकायला लागलाय आणि सर्वप्रथम त्यानंच आपली प्रीती पाहिली आहे. यानंतर येणारी रजनीही तुझी माझी प्रेमगीतं ऐकणार आहे. दूर कुठंतरी एक विहंग गातोय. प्रेमात आपली दु:खं परकी होतात हेच जणू तो सांगतोय. हृदयातली धडधड काय असते ते प्रेम केल्याविना समजणारच नाही.