अ‍ॅपशहर

बहुत शुक्रिया बडी मेहरबानी

‘एक मुसाफिर एक हसिना’ या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातील हे गीत आज ५५ वर्षं होऊन गेली, तरी श्रवणीय आणि सदाबहार वाटतं.

Maharashtra Times 9 Jun 2017, 3:00 am
‘एक मुसाफिर एक हसिना’ या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातील हे गीत आज ५५ वर्षं होऊन गेली, तरी श्रवणीय आणि सदाबहार वाटतं. कश्मीर सरहद्दीवर ले. अजय हा तरुण नायक नायिका आशाला गुंडांच्या तावडीतून सोडवतो; पण गुंडांनी मरता-मरता फेकलेल्या क्षेपणास्त्रामुळे तो जखमी होऊन बेशुद्ध पडतो. या आघातामुळे त्याची स्मृति नष्ट होते. तो शुद्धीवर येतो तेव्हा नायिकेला हे कळून चुकतं. त्यावेळेला झालेली त्यांची कोंडी, घालमेल आणि अगतिकता फक्त पाहण्याशिवाय नायिकेला काही करता येत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ek musaphir joy mukharji sadhana
बहुत शुक्रिया बडी मेहरबानी

तथापि आपल्या जखमी अवस्थेत नायिकेनं आपली शुश्रूषा करून आपल्याला ठिकाणावर आणलं याची त्याला जाणीव असते. त्यामुळे पेटीची सरगम कानावर पडताच उत्स्फूतपणे तो हे गाणे म्हणतो, त्यात कृतज्ञता व्यक्त होते.
बहुत शुक्रिया बडी मेहरबानी
मेरी जिंदगी में हुजूर आप आए
कदम चूम लूँ या ये आँखें बिछा दूँ
करूँ क्या ये मेरी समझ में न आए
करूँ पेश तुमको नज़राना दिल का
के बन जाए कोई अफ़साना दिल का
खुदा जाने ऐसी सुहानी घड़ी फिर
मेरी जिंदगी में पलट के न आए
खुशी तो बहुत है, मगर ये भी गम है
के ये साथ अपना कदम दो कदम है
मगर ये मुसाफ़िर दुआ माँगता है
खुदा आपसे किसी दिन मिलाए
या गाण्याला ओ.पी नय्यर यांचं संगीत असून, ते महंमद रफी आणि आशा भोसले यांनी गायलं आहे. रफी आणि आशा यांच्या आवाजाच्या सफाईबद्दल आणि शद्बोच्चाराबद्दल तर प्रश्नच नाही; पण या गाण्यात सर्वांत कमाल केली आहे, ती पेटीवादक बाबूसिंग यांनी. गाण्याला उठाव आणण्यासाठी धृपद संपल्यावर काही क्षणातच, सारंग आणि मल्हार या दोन रागांची मिश्र धून त्यांनी अशा काही डौलानं वाजवली आहे, की ऐकण्याची मान त्याच्या नकळत डोलायला लागलीच पाहिजे.
नायिकाही त्याला प्रतिसाद देत म्हणते...
मुझे ‌डर है मुझ में, गरुर आ न जाए
लगूं झूमने मैं सरूर आ ना जाए
कही दिल न मेरा, ये तारीफ सुनकर
तुम्हारा बने, और मुझे भूल जाए
आज गायक रफी, संगीतकार नय्यर आणि नायक-‌नायिका (जॉय मुखर्जी आणि साधना) ही सर्व मंडळी काळाच्या पडद्याआड गेली आहेत; पण हे गाणं रसिकांच्या मनात आपलं स्थान टिकवून आहे. काही वर्षांपूर्वी ओ.पी. नय्यर गौरवग्रंथ निघाला होता, त्यात एका रसिकानं लेखाचं नावच ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’ असं दिलं होतं, यावरून ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज