अ‍ॅपशहर

दो घड़ी वो जो पास आ बैठे

‘दो घड़ी वो जो पास आ बैठे’ हे यातलं गाणं फार सुंदर आहे. अव्यक्त प्रेम फार सुंदर रितीनं या गाण्यात व्यक्त केलं आहे.

Maharashtra Times 10 May 2017, 3:00 am
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीनं आपल्याला बरंच काही दिलं आहे. खूप चांगले चित्रपट आणि महत्त्वाचं म्हणजे विविध गाण्यांचा खजिना; पण त्यातलं एखादं गाणं असं असतं, जे आपल्याला भावतं, त्यातला एखादा क्षण फार बोलका असतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gate way of india madhubala bharat bhushann
दो घड़ी वो जो पास आ बैठे

१९५७ साली आलेला ‘गेट वे ऑफ इंडिया’ हा सिनेमा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जे.ओमप्रकाश दिग्दर्शित आणि मदन मोहन यांचं संगीत लाभलेला हा चित्रपट मधुबाला आणि भारत भूषण यांच्यावर चित्रित झाला आहे. ‘दो घड़ी वो जो पास आ बैठे’ हे यातलं गाणं फार सुंदर आहे. अव्यक्त प्रेम फार सुंदर रितीनं या गाण्यात व्यक्त केलं आहे. कागदावर मनातील भावना उतरत राहातात आणि हे गाणं पुढं सरकत राहातं. हे गाणं अशा टप्प्यावर येतं जिथं तो म्हणतो, की
एक दिल ही था ग़मगुसार अपना
मेहेरबा, ख़ास राज़दार अपना
गैर का क्यो उसे बना बैठे ?
‘गैर’ म्हटल्यावर मधुबालानं जे काही भाव व्यक्त केले आहेत ते लाजवाब आहेत. असं म्हटल्यावर ती फार दुखावली जाते; पण नंतर सावरते आणि गाणं पुढं सुरू राहातं. या गाण्यातील हाच तो बोलका आणि हळवा क्षण, ज्याला मधुबालानं योग्य न्याय दिला आहे.
दो घड़ी वो जो पास आ बैठे
हम ज़मानेसे दूर जा बैठे
भूल की उनका हमनशी हो के
रोएंगे दिल को उम्रभर खो के
हाये क्या चीज़ थीं लूटा बैठे
दिलको एक दिन ज़रूर जाना था
वही पोहोचा जहाँ ठिकाना था
दिल वही दिल जो दिलमे जा बैठे
एक दिल ही था ग़मगुसार अपना
मेहेरबाबा, ख़ास राज़दार अपना
गैर का क्यो उसे बना बैठे ?
गैर भी तो कोई हँसी होगा
दिल यूँही दे दिया नही होगा
देखकर कुछ तो चोट खा बैठे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज