अ‍ॅपशहर

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

माणिक वर्मा यांनी गायलेलं ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हे गाणं लागलं, की मी त्यात रंगून जायचे. रचना संत नामदेव महाराज यांची होती, तर संगीत बाळ माटे यांनी दिलं आहे.

Maharashtra Times 14 Jun 2017, 3:00 am
फार वर्षांपूर्वी रेडिओ फार कमी लोकांकडे असायचा. तेव्हा रेडिओ हे मनोरंजनासाठी एक प्रभावी माध्यम होतं. रेडिओवर ‘आपली आवड’, ‘कामगार सभा’, ‘गृहिणी’, शुक्रवारी रात्री ‘श्रुतिका’ असे कार्यक्रम लागायचे. तेव्हा आम्ही तळेगाव ढमढेरेला राहत असू. काम करता करता ट्रान्सिस्टरवर गाणी आणि इतर कार्यक्रम ऐकण्याचा मला छंदच जडला. त्यावेळी माणिक वर्मा यांनी गायलेलं ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हे गाणं लागलं, की मी त्यात रंगून जायचे. रचना संत नामदेव महाराज यांची होती, तर संगीत बाळ माटे यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manik varma baal mate sant namdev
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

ही रचना माझ्या अतिशय आवडीची आहे. माणिकताईंच्या आवाजातील त्या गोड गळ्याची मी चाहती झाले. शब्द, सूर, ताल यांचा त्रिवेणी संगम या गाण्यात आहे. त्यातील त्यांनी घेतलेल्या ताना अनुपम आहेत. या गाण्याची अजून एक आठवण सांगायची म्हणजे, मी सातवीत असताना म्हणजे साधारण १९४७ साली बारामती इथं गणेशोत्सवातील एका कार्यक्रमात त्या आल्या होत्या. तेव्हा त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हे गाणं त्यांच्या तोंडून थेट ऐकताना मला अमाप आनंद झाला होता. खरोखरंच माणिकताई या मराठी संगीत क्षेत्राला मिळालेलं एक अमूल्य असं रत्न आहे.
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे
सांगे पंढरीराया काय करू यासी
का रूप ध्यानासी न ये तुझे
कीर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे
या गाण्याच्या प्रत्येक ओळीत खूप अर्थ सामावला आहे आणि तो अर्थ आत्मिक समाधान देतो. माझ्या आईची त्यांनी अतिशय मनापासून काळजी घेतली. त्यांच्या गॅलक्सी लॅप्रोस्कोपी हॉस्पिटलच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय मदत केली आणि शेवटपर्यंत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.
केमोथेरपीनंतर रक्ताची चाचणी करायला लागायची तेव्हा आम्ही डॉ. मंदार परांजपे यांच्याकडे जायचो. त्यांच्या स्टाफनं केलेली मदत मी आजन्म विसरणार नाही. माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचे, नातेवाईकांचेही आभार. विशेषतः कुंदा मावशी, लता मावशी आणि बाळू मामा यांनी आम्हाला जो आधार दिला त्याची तुलना कशाचीच करता येणार नाही. आणि अखेर माझ्या आईचेही आभार. जाता-जाता तिनं मला वारंवार सांगितलं, की माणसं जोडत राहा. जोपर्यंत माणसं जवळ आहेत, जिवंत आहेत तोपर्यंत त्याची कदर कर. काळजी कर. एकदा का ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली, की काही उपयोग नसतो. व्यक्त केलेल्या दुःखालाही काहीच अर्थ राहत नाही. एकंदरितच आईच्या आजारानं मला माणसातल्या माणुसकीचं दर्शन घडवलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज