मलमली तारुण्य माझे...
१९७० साली प्रदर्शित झालेल्या 'घरकुल' या चित्रपटातील हे गाणं माझं अतिशय आवडतं आहे. श्रृंगार रसातील या गाण्यात गायिका आशाताई भोसले यांनी जान ओतली आहे. सुरेश भटांचे काव्य तर लाजवाबच आहेत. गाण्याच्या प्रत्येक ओळींमधून एका स्त्रीचे अंतरंग बिनदिक्कत उलगडून दाखवणारं असं हे काव्य आहे.
Maharashtra Times 2 Feb 2017, 12:46 am
मिलिंद कोर्लेकर, ठाणे
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसांत माझ्या
तू जिवाला गुंतवावे...
लागुनी थंडी गुलाबी
शिरशिरी यावी अशी की
राजसा, माझ्यात तू अन्
मी तुझ्यामाजी भिनावे...
तापल्या माझ्या तनूची
तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे
पुन्हा तू पेटवावे !
रे तुला बाहूत माझ्या
रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे
तू मला बिलगून जावे...
१९७० साली प्रदर्शित झालेल्या 'घरकुल' या चित्रपटातील हे गाणं माझं अतिशय आवडतं आहे. श्रृंगार रसातील या गाण्यात गायिका आशाताई भोसले यांनी जान ओतली आहे. सुरेश भटांचे काव्य तर लाजवाबच आहेत. गाण्याच्या प्रत्येक ओळींमधून एका स्त्रीचे अंतरंग बिनदिक्कत उलगडून दाखवणारं असं हे काव्य आहे. एका सुखवस्तू व्यक्तीच्या लग्नबाह्य संबंधांवर प्रकाश टाकणारं हे गाणं त्या काळात नाविन्यपूर्ण होतं. अण्णा म्हणजेच स्व. सी. रामचंद्र यांचे लयबद्ध संगीत आणि त्यामध्ये केलेल्या सतारीच्या सुयोग्य वापरामुळे गाणं अधिक खुललं आहे.
चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात याच अनैतिक संबंधातून वादळ निर्माण होतं आणि त्याची सुरुवात या गाण्यातून दिग्दर्शकांनी सूचित केली आहे. या गाण्याची एक खासियत म्हणजे चित्रपटाची गोष्ट किंवा संदर्भ माहित नसूनसुद्धा गाणं नुसतं डोळे मिटून ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे.
गाण्याचं प्रत्येक कडवं आणि ध्रुव पद भावना चाळवणारं आहेतच हे सांगण्याची गरजच नाही. कोठीवरील गाण्याचा बाज आणि एकंदरीत उपेक्षित पार्श्वभूमी गाण्यात असूनसुद्धा सुंदर काव्यामुळे आणि संगीतामुळे हे गाणं श्रवणीय झालंय. स्व.अरुण सरनाईक, हिंदीतील अभिनेते ओमप्रकाश आणि इंदुमती पैंगणकर यांनी गाण्याला साजेसा अभिनय करून गाणं प्रेक्षणीय बनवलंय.
मलमली तारुण्य माझे
तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसांत माझ्या
तू जिवाला गुंतवावे...
लागुनी थंडी गुलाबी
शिरशिरी यावी अशी की
राजसा, माझ्यात तू अन्
मी तुझ्यामाजी भिनावे...
तापल्या माझ्या तनूची
तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे
पुन्हा तू पेटवावे !
रे तुला बाहूत माझ्या
रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे
तू मला बिलगून जावे...
१९७० साली प्रदर्शित झालेल्या 'घरकुल' या चित्रपटातील हे गाणं माझं अतिशय आवडतं आहे. श्रृंगार रसातील या गाण्यात गायिका आशाताई भोसले यांनी जान ओतली आहे. सुरेश भटांचे काव्य तर लाजवाबच आहेत. गाण्याच्या प्रत्येक ओळींमधून एका स्त्रीचे अंतरंग बिनदिक्कत उलगडून दाखवणारं असं हे काव्य आहे. एका सुखवस्तू व्यक्तीच्या लग्नबाह्य संबंधांवर प्रकाश टाकणारं हे गाणं त्या काळात नाविन्यपूर्ण होतं. अण्णा म्हणजेच स्व. सी. रामचंद्र यांचे लयबद्ध संगीत आणि त्यामध्ये केलेल्या सतारीच्या सुयोग्य वापरामुळे गाणं अधिक खुललं आहे.
चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात याच अनैतिक संबंधातून वादळ निर्माण होतं आणि त्याची सुरुवात या गाण्यातून दिग्दर्शकांनी सूचित केली आहे. या गाण्याची एक खासियत म्हणजे चित्रपटाची गोष्ट किंवा संदर्भ माहित नसूनसुद्धा गाणं नुसतं डोळे मिटून ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे.
गाण्याचं प्रत्येक कडवं आणि ध्रुव पद भावना चाळवणारं आहेतच हे सांगण्याची गरजच नाही. कोठीवरील गाण्याचा बाज आणि एकंदरीत उपेक्षित पार्श्वभूमी गाण्यात असूनसुद्धा सुंदर काव्यामुळे आणि संगीतामुळे हे गाणं श्रवणीय झालंय. स्व.अरुण सरनाईक, हिंदीतील अभिनेते ओमप्रकाश आणि इंदुमती पैंगणकर यांनी गाण्याला साजेसा अभिनय करून गाणं प्रेक्षणीय बनवलंय.