>> रुपाली ठोंबरे, कळवा
मी हजार चिंतांनी हे
डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो,
घुमतो, शीळ वाजवतो
हे संदीप खरेंचे हे गाणं प्रत्येकानेच एकलेलं असावं. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी हे सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं नाव आहे. ते त्यांच्या गाण्यांच्या सुरेख मैफिलीमुळे. 'आयुष्यावर बोलू काही' ती नुसती मैफिलच नाही तर मनसोक्त जीवनाचा आनंद बहाल करणारी आणि तहानलेल्या रसिकांना एका वाटेवर भेटलेली एक पाणपोईच आहे. खरंच आयुष्यावर बोलता बोलता हे दोघं थेट रसिकांच्या हृदयाला भिडतात. अगदी अमुल्य असा गाणंरुपी नजराणा आपल्याला बहाल करतात. अर्थपूर्ण पण अगदी साध्या सोप्या शब्दांत गुंफलेल्या आणि तितकीच सहज सोपी चाल दिलेली गाणी असतात. अबालवृद्धांपासून सर्वांनाच सहज गुणगुणता येईल असं काहीतरी खास गाणं असतं. म्हणूनच त्यांच्या हजाराव्या प्रयोगालाही लहान चिमुरडीपासून ते ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. त्यांची प्रत्येक कविताच मनात खोलवर रुजते. माझं म्हणाल तर माझा दिवस सुरु होतो तो या कवितांनी आणि संपतो तोही यांच्याच सानिध्यात. पण त्यातली ही कविता मला अधिक प्रिय आहे.
आपण स्वतःबद्दल 'मी' हे संबोधन अगदी सहज वापरतो. पण कधी या 'मी'ला ओळखलं आहे का? खरंतर कवीने या कवितेत सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकातच दोन मी दडलेले असतात. एक नेहमी रडणारा, कोणत्याही परिस्थितीतील वाईट बाजू अचूक ओळखणारा आणि मग अशा 'मी'ला सतत चिंता भेडसावत असते. एखादी अनामिक भीती कायम पाठराखीण म्हणून सोबतीला उभी असते. याउलट आपल्यात असाही एक 'मी' असतो जो नेहमी सुखी असतो आणि त्याचा दु:खाशी काहीच संबंध नसतो. एक 'मी' नेहमी क्षुद्र विचारांच्या काळोखात बंदिस्त झालेला तर दुसरा स्वच्छंदी मनाने मोकळ्या हवेत तरंगणारा असतो. खरंच आपल्या एका बदलेल्या दृष्टीकोनातून देवाकडूनच आपले आभार प्रकट होत असतील तर त्या सारखा आनंद हजार सुखांतही मिळणार नाही आणि अशा सकारात्मक दृष्टीकोनातून जीवनवृक्षावर कधी नव्या संधींचे फाटे फुटतील आणि कधी ते आनंदाच्या फुलोऱ्याने बहरून जाईल हे आपले आपल्यालाच कळणार नाही. अशाप्रकारे आपल्यातला एक 'मी'च आपल्याला हवं ते आपल्या नकळतच मिळवून देईल. फक्त तो 'मी' सकारात्मक हवा की, नकारात्मक हे ज्याच त्यानच ठरवावं लागतं. या गाण्यातील काही ओळी खालीलप्रमाणे-
मी हजार चिंतांनी हे
डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो,
घुमतो, शीळ वाजवतो
हे संदीप खरेंचे हे गाणं प्रत्येकानेच एकलेलं असावं. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी हे सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं नाव आहे. ते त्यांच्या गाण्यांच्या सुरेख मैफिलीमुळे. 'आयुष्यावर बोलू काही' ती नुसती मैफिलच नाही तर मनसोक्त जीवनाचा आनंद बहाल करणारी आणि तहानलेल्या रसिकांना एका वाटेवर भेटलेली एक पाणपोईच आहे. खरंच आयुष्यावर बोलता बोलता हे दोघं थेट रसिकांच्या हृदयाला भिडतात. अगदी अमुल्य असा गाणंरुपी नजराणा आपल्याला बहाल करतात. अर्थपूर्ण पण अगदी साध्या सोप्या शब्दांत गुंफलेल्या आणि तितकीच सहज सोपी चाल दिलेली गाणी असतात. अबालवृद्धांपासून सर्वांनाच सहज गुणगुणता येईल असं काहीतरी खास गाणं असतं. म्हणूनच त्यांच्या हजाराव्या प्रयोगालाही लहान चिमुरडीपासून ते ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. त्यांची प्रत्येक कविताच मनात खोलवर रुजते. माझं म्हणाल तर माझा दिवस सुरु होतो तो या कवितांनी आणि संपतो तोही यांच्याच सानिध्यात. पण त्यातली ही कविता मला अधिक प्रिय आहे.
आपण स्वतःबद्दल 'मी' हे संबोधन अगदी सहज वापरतो. पण कधी या 'मी'ला ओळखलं आहे का? खरंतर कवीने या कवितेत सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकातच दोन मी दडलेले असतात. एक नेहमी रडणारा, कोणत्याही परिस्थितीतील वाईट बाजू अचूक ओळखणारा आणि मग अशा 'मी'ला सतत चिंता भेडसावत असते. एखादी अनामिक भीती कायम पाठराखीण म्हणून सोबतीला उभी असते. याउलट आपल्यात असाही एक 'मी' असतो जो नेहमी सुखी असतो आणि त्याचा दु:खाशी काहीच संबंध नसतो. एक 'मी' नेहमी क्षुद्र विचारांच्या काळोखात बंदिस्त झालेला तर दुसरा स्वच्छंदी मनाने मोकळ्या हवेत तरंगणारा असतो. खरंच आपल्या एका बदलेल्या दृष्टीकोनातून देवाकडूनच आपले आभार प्रकट होत असतील तर त्या सारखा आनंद हजार सुखांतही मिळणार नाही आणि अशा सकारात्मक दृष्टीकोनातून जीवनवृक्षावर कधी नव्या संधींचे फाटे फुटतील आणि कधी ते आनंदाच्या फुलोऱ्याने बहरून जाईल हे आपले आपल्यालाच कळणार नाही. अशाप्रकारे आपल्यातला एक 'मी'च आपल्याला हवं ते आपल्या नकळतच मिळवून देईल. फक्त तो 'मी' सकारात्मक हवा की, नकारात्मक हे ज्याच त्यानच ठरवावं लागतं. या गाण्यातील काही ओळी खालीलप्रमाणे-